एखाद्या बाईचा नवरा गेला की…
तिचं आयुष्य संपत नाही,
पण समाज तिचं जगणं मात्र हळूहळू संपवायला लागतो.
कालपर्यंत तिच्या कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र आणि चेहऱ्यावरचं हसू पाहून
“भाग्यवान” म्हणणारेच लोक…
आज त्याच हसण्यावर आक्षेप घेतात…
ती जरा हसली, तर प्रश्न…
ती नीट तयार झाली, तर कुजबुज…
ती बाहेर पडली, तर नजर…
आणि ती शांत राहिली, तरीही तिला सोडलं जात नाही…
का…?
तिचा नवरा गेला म्हणून तिने जगणंही थांबवावं का…?
एक पुरुष बायको गमावतो,
तर समाज त्याला धीर देतो…
“पुन्हा संसार कर” असं सहज सांगतो…
पण तीच वेळ जेव्हा एका स्त्रीवर येते,
तेव्हा तिच्या आयुष्याभोवती नियमांचं जाळं विणलं जातं…
तिला रंगीत कपडे घालू नको म्हणतात…
तिच्या सण-उत्सवात सहभागी होण्यावर बंधन घालतात…
तिच्या आनंदालाच जणू पाप ठरवलं जातं…
कधी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते…
कधी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न होतो…
कधी “लोक काय म्हणतील” या नावाखाली तिचं आयुष्यच कैद केलं जातं…
हे सगळं सहन करत ती जगत असते…
कारण तिच्याकडे पर्याय नसतो…
तिच्यावर घराची जबाबदारी येते…
मुलांचं भविष्य तिच्या खांद्यावर येतं…
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती सगळ्यांसाठी उभी राहते…
पण समाजाला तिचं धैर्य दिसत नाही…
दिसतं ते फक्त तिचं “विधवा” असणं…
खरं तर तिचा गुन्हा काहीच नाही…
तरीही शिक्षा मात्र तिलाच…
ती हसली तर तुम्हाला त्रास होतो…
पण तिच्या रडण्याने तुमची कधी झोप उडाली का…?
तिच्या चारित्र्यावर बोट ठेवणारे तुम्हीच…
तिच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकता का…?
“लोक काय म्हणतील” म्हणून तिला थांबवणारे तुम्ही…
लोकांपुढे तिच्यासाठी उभं राहता का…?
तिच्या आयुष्यावर मर्यादा लावणारे तुम्ही…
तिच्या वेदनांचा थोडा भाग उचलू शकता का…?
तिला सांगता “जपून राहा”…
पण तिच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला तयार आहात का…?
तिच्या दुःखाच्या वेळी दोन शब्द दिले नाहीत…
आणि आज तिच्या जगण्यावर निर्णय देत बसलात…
हेच खरं आहे समाजाला तिचं दुःख नाही दिसत…
फक्त तिच्यावर बोलायचा विषय दिसतो…
ती एकटी पडली म्हणून कमकुवत नाही…
ती एकटी उभी आहे म्हणून मजबूत आहे…
आता बदलायला हवं…तिच्या कपड्यांवर नाही, तिच्या जखमांवर लक्ष द्यायला हवं…
तिच्या हसण्यावर प्रश्न नाही, तर तिच्या आयुष्याला आधार द्यायला हवा..
तिचं आयुष्य संपत नाही,
पण समाज तिचं जगणं मात्र हळूहळू संपवायला लागतो.
कालपर्यंत तिच्या कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र आणि चेहऱ्यावरचं हसू पाहून
“भाग्यवान” म्हणणारेच लोक…
आज त्याच हसण्यावर आक्षेप घेतात…
ती जरा हसली, तर प्रश्न…
ती नीट तयार झाली, तर कुजबुज…
ती बाहेर पडली, तर नजर…
आणि ती शांत राहिली, तरीही तिला सोडलं जात नाही…
का…?
तिचा नवरा गेला म्हणून तिने जगणंही थांबवावं का…?
एक पुरुष बायको गमावतो,
तर समाज त्याला धीर देतो…
“पुन्हा संसार कर” असं सहज सांगतो…
पण तीच वेळ जेव्हा एका स्त्रीवर येते,
तेव्हा तिच्या आयुष्याभोवती नियमांचं जाळं विणलं जातं…
तिला रंगीत कपडे घालू नको म्हणतात…
तिच्या सण-उत्सवात सहभागी होण्यावर बंधन घालतात…
तिच्या आनंदालाच जणू पाप ठरवलं जातं…
कधी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते…
कधी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न होतो…
कधी “लोक काय म्हणतील” या नावाखाली तिचं आयुष्यच कैद केलं जातं…
हे सगळं सहन करत ती जगत असते…
कारण तिच्याकडे पर्याय नसतो…
तिच्यावर घराची जबाबदारी येते…
मुलांचं भविष्य तिच्या खांद्यावर येतं…
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती सगळ्यांसाठी उभी राहते…
पण समाजाला तिचं धैर्य दिसत नाही…
दिसतं ते फक्त तिचं “विधवा” असणं…
खरं तर तिचा गुन्हा काहीच नाही…
तरीही शिक्षा मात्र तिलाच…
ती हसली तर तुम्हाला त्रास होतो…
पण तिच्या रडण्याने तुमची कधी झोप उडाली का…?
तिच्या चारित्र्यावर बोट ठेवणारे तुम्हीच…
तिच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकता का…?
“लोक काय म्हणतील” म्हणून तिला थांबवणारे तुम्ही…
लोकांपुढे तिच्यासाठी उभं राहता का…?
तिच्या आयुष्यावर मर्यादा लावणारे तुम्ही…
तिच्या वेदनांचा थोडा भाग उचलू शकता का…?
तिला सांगता “जपून राहा”…
पण तिच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला तयार आहात का…?
तिच्या दुःखाच्या वेळी दोन शब्द दिले नाहीत…
आणि आज तिच्या जगण्यावर निर्णय देत बसलात…
हेच खरं आहे समाजाला तिचं दुःख नाही दिसत…
फक्त तिच्यावर बोलायचा विषय दिसतो…
ती एकटी पडली म्हणून कमकुवत नाही…
ती एकटी उभी आहे म्हणून मजबूत आहे…
आता बदलायला हवं…तिच्या कपड्यांवर नाही, तिच्या जखमांवर लक्ष द्यायला हवं…
तिच्या हसण्यावर प्रश्न नाही, तर तिच्या आयुष्याला आधार द्यायला हवा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा