पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुणतरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृद्धाश्रमामध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य कंठण्याची वेळ येणार यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंतांना जन्म देत आहे कारण मुलामुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्तीच्या आयुष्याचे नियोजन करू शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही. कौटुंबिक आयुष्यात बऱी वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे. शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे. तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.
खरं तर बायोडाटा बघून किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करून विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल याचा विवाहेच्छुक तरुणतरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारच आहेत पण सामाजिक संतुलन बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा ह्या बाबी मारक ठरत आहेत. स्त्री - पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपानसारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला मुलींचे वय निघून जात आहे याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहील हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहील हे सांगता येत नाही.
पालकांनो आणि मुला मुलींनो भविष्याचा विचार करून आजच निर्णय घ्या.
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्र्चातापाला अर्थ नाही.
किमान आज ज्या मुला मुलींचे वय 35 किंवा 40 झाले आहे त्यांनी तरी पुढील पिढींना ज्यांचे वय 30 च्या आत आहे या लग्न योग्य मुला-मुलींना सांगावे की सर्वच अपेक्षा पूर्ण होणार नाहीत काही आपल्याला स्व कष्टातून पूर्ण कराव्या लागतील. आम्ही खूप अपेक्षा घेऊन लग्न करावयाच्या विचारात होतो पण त्यापेक्षा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. एकीकडे बंगला आहे तर शेती कमी आहे तर दुसरीकडे नोकरी आहे पण जमीन कमी आहे. जमीन खूप आहे पण नोकरी करत नाही ( ज्या मुलाला सात किंवा आठ एकरापेक्षा जास्त जमीन आहे तो मुलगा नोकरी करू शकत नाही, कारण एका नोकरदारा एवढे उत्पन्न एवढ्या शेतीतून निघते मग त्याला वाटते की मी नोकरी का करावी.) या सर्वात खूप मोठी जबाबदारी मुलांच्या आणि मुलींच्या आई-वडिलांवर आहे त्यांनी आपल्या मुलांना योग्य जोडीदार बघून लग्न करण्याची मानसिकता तयार करावी. शेवटी आपण लग्न करतोय का डील ( व्यवहार) करतोय याचाही विचार करावा कारण खूप पैसा बंगला गाडी म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही लग्न पैशाशी करताय का माणसाशी कारण मुलांकडच्या मंडळीला वाटते की मुलगी छान संस्कारी असावी. मुलींकडल्या मंडळींना वाटते की खूप पैसा बंगला गाडी नोकर चाकर या सर्व गोष्टी असाव्यात . मग ठरवा आपण लग्न कोणाशी करतोय एका व्यक्तीशी का प्रॉपर्टी शी ज्यांनी लग्न करतेवेळी आपल्या अटींमध्ये शिथिलता आणली नाही आणि आज ज्या मुला मुलींचे वय 35 किंवा 40 आहे अशांना विचारा ते सांगतील की योग्य वेळी चांगली स्थळ आली होती आणि आम्ही थोडसं ऍडजेस्ट केलं नाही म्हणून आज हे दिवस येतात. शेवट संसार करत असताना अनेक गोष्टी तुम्हाला अड्जस्ट कराव्या लागतात शंभर टक्के गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतच नसतात. काही हरकत आहे.
खरं तर बायोडाटा बघून किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करून विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल याचा विवाहेच्छुक तरुणतरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारच आहेत पण सामाजिक संतुलन बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा ह्या बाबी मारक ठरत आहेत. स्त्री - पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपानसारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला मुलींचे वय निघून जात आहे याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहील हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहील हे सांगता येत नाही.
पालकांनो आणि मुला मुलींनो भविष्याचा विचार करून आजच निर्णय घ्या.
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्र्चातापाला अर्थ नाही.
किमान आज ज्या मुला मुलींचे वय 35 किंवा 40 झाले आहे त्यांनी तरी पुढील पिढींना ज्यांचे वय 30 च्या आत आहे या लग्न योग्य मुला-मुलींना सांगावे की सर्वच अपेक्षा पूर्ण होणार नाहीत काही आपल्याला स्व कष्टातून पूर्ण कराव्या लागतील. आम्ही खूप अपेक्षा घेऊन लग्न करावयाच्या विचारात होतो पण त्यापेक्षा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. एकीकडे बंगला आहे तर शेती कमी आहे तर दुसरीकडे नोकरी आहे पण जमीन कमी आहे. जमीन खूप आहे पण नोकरी करत नाही ( ज्या मुलाला सात किंवा आठ एकरापेक्षा जास्त जमीन आहे तो मुलगा नोकरी करू शकत नाही, कारण एका नोकरदारा एवढे उत्पन्न एवढ्या शेतीतून निघते मग त्याला वाटते की मी नोकरी का करावी.) या सर्वात खूप मोठी जबाबदारी मुलांच्या आणि मुलींच्या आई-वडिलांवर आहे त्यांनी आपल्या मुलांना योग्य जोडीदार बघून लग्न करण्याची मानसिकता तयार करावी. शेवटी आपण लग्न करतोय का डील ( व्यवहार) करतोय याचाही विचार करावा कारण खूप पैसा बंगला गाडी म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही लग्न पैशाशी करताय का माणसाशी कारण मुलांकडच्या मंडळीला वाटते की मुलगी छान संस्कारी असावी. मुलींकडल्या मंडळींना वाटते की खूप पैसा बंगला गाडी नोकर चाकर या सर्व गोष्टी असाव्यात . मग ठरवा आपण लग्न कोणाशी करतोय एका व्यक्तीशी का प्रॉपर्टी शी ज्यांनी लग्न करतेवेळी आपल्या अटींमध्ये शिथिलता आणली नाही आणि आज ज्या मुला मुलींचे वय 35 किंवा 40 आहे अशांना विचारा ते सांगतील की योग्य वेळी चांगली स्थळ आली होती आणि आम्ही थोडसं ऍडजेस्ट केलं नाही म्हणून आज हे दिवस येतात. शेवट संसार करत असताना अनेक गोष्टी तुम्हाला अड्जस्ट कराव्या लागतात शंभर टक्के गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतच नसतात. काही हरकत आहे.
पालकांनो जरा विचार करा आणि आपण आपल्या मागच्या आयुष्यात डोकावून पहावं आणि विचार करावा की आपल्या मनासारख्या आजपर्यंत 50% तरी गोष्टी झालेल्या आहेत का, निश्चित नाहीत आणि तरीसुद्धा आज आपण एक यशस्वी जीवन जगत आहोत. मग स्थळ पाहतानाच आम्हाला असं असं स्थळ पाहिजे, नंतर करतील हे आम्हाला नको, ऑलरेडी सगळं रेडीमेड पाहिजे. आपण विचार करत असलेले स्थळ फक्त काल्पनिकच आहे वास्तवात अस स्थळ नसतच मग आपण मृगजळाच्या मागे तर धावत नाही ना याचा थोडासा विचार करावा. आता थोडसं पाठीमागे पाहिलं तर लक्षात येईल की वीस वर्षांपूर्वी वय 30 होण्या अगोदर मुलींना दोन मुलं असत आणि त्या मुलीचं वय वर्ष35 व्या वर्षी ती मुलं नववी दहावीला असत. आणि आता मुलीचं वय 30-35 झालं तरीसुद्धा लग्न स्थळ बघणं चालू आहे.
एक भीषण वास्तव
एक भीषण वास्तव