तिने मोठ्या मुलाला फोन लावला..
"हॅलो "
"बोल आई"
"अरे, दिवाळी जवळ आली ,केव्हा येतोय?"
"अगं,दिवाळीची बहुतेक लोकांनी सुट्टी घेतली आहे अगोदरच आणि वर्कलोड फार आहे. त्यामुळे कठीण वाटते आहे."
"अरे...पण दिवाळीचे चार दिवस तरी"
" नुकतेच प्रमोशन झाले आहे आई.सध्या तरी नाही जमणार"
"ऑफिसला तर सुट्टीच असणार ना? मग राहून काय करतो?"
"इथले बाकीचे काम उरकून टाकतो.फ्लॅट बघायचा आहे. काही कागदपत्रे अपडेट करायची आहेत."
" म्हणजे दिवाळीलाही नाही येणार?" तिचा स्वर हळवा झाला.
"आई, उगाच इमोशनल नको होऊ.दिवाळीनंतर मला चांगली आठवडाभराची रजा मिळणार आहे.बॉसनेच सांगितले.मग येऊन राहिल निवांत गावी."
***
तिने लेकीला फोन लावला.
"हॅलो"
" आई आता तुलाच फोन लावणार होते"
"का गं?"
"ह्यावेळी दिवाळीला येणे कठीण आहे ग."
"का?"
"प्रोजेक्ट सबमीट करायचा आहे गं."
"तो तर पुढच्या महिन्यात करायचाय ना?"
"हो .पण आता शेवटचा हात फिरवायचा आहे. सर म्हणाले आता सगळे होत आले आहे तर लिंक तोडू नको. "
"अग पण चार दिवसांनी असा कोणता मोठा फरक पडणार आहे?"
"प्लीज आई,आग्रह करू नको. प्रोजेक्ट झाला की मी महिनाभर येऊन राहिल हवी तर."
****
मुले येणार नसल्याने निराश मनस्थितीत तिला नीट झोप लागलीच नाही. पण नेहमीच्या सवयीने पहाटे जाग आली. बाहेर आली तर देवघरातला लाईट चालू होता. काल रात्री तर आठवणीने बंद केला होता.ती घराबाहेर आली. अजून अंधारलेलंच होते. बघते तर घराचे अंगण स्वच्छ झाडून सडा घालून ठेवलेले होते. घराबाहेरच्या कुंपणाच्या कोपऱ्यावर एक पणतीही लावलेली. तेवढ्यात धूमधडाम आवाज आला. तिने घाबरून कान बंद केले तसा रस्त्यावरून हसत हसत तिचा नवरा आला.
" तुला उठवण्यासाठीच एटमबाँब लावला तर तू आधीच उठलेली. "
"काय हे? ह्या वयात शोभत का फटाके उडवणे? शेजारीपाजारी काय म्हणतील?"
"काय म्हणतील? म्हणतील की म्हाताऱ्याचे डोके फिरले" तिचा नवरा पुन्हा हसत म्हणाला.
" आणि एवढ्या थंडीचे बनीयन बर्म्युडावर काय फिरताय? थंडी बाधेल. चला आत मी चहा ठेवते."
"चहा झाला आहे माझा. तुझाही ठेवला आहे.चहा पी आणि लवकर आटप .आपण गणपतीच्या दर्शनाला जाऊन येऊ."
ती दोघे निघाली तेव्हा मस्त गुलाबी थंडी पडली होती.सकाळची वेळ असूनही बाजार भरत चालला होता. इतक्या सकाळीही काही खरेदीदार लगबगीने जात होते. दुकाने सजवली जात होती. गणपतीचे दर्शन घेऊन येतांना तिच्या नव-याने गजरा घेतला. एरवी तिने "कशाला या वयात गजराबिजरा" म्हणून विरोध केला असता. पण आज तिने आवडीने तो अर्ध्या पांढऱ्या झालेल्या केसात माळला. तिला अगदी प्रसन्न वाटत होते. ती मनाशीच म्हणाली.....
आपला आनंद आपणच शोधायचा.
खरे तर हे एक साधे उदाहरण , पण ज्या वेळेस आयुष्याची पाने पिवळी होऊ लागतात व एक पोकळी निर्माण होते त्यावेळेस मुलांचा सहवास हवाहवासा वाटतो नेमके त्याच वेळेस मुले अनेक सबबी सांगून गोष्टी टाळतात may be त्यांच्या बाबतीत ते योग्य असेलही , पण आपले मन ते ACCEPT करत नाही , कारण मन हळवे झालेले असते , आयुष्यात बऱ्याच खस्ता खाऊन झाल्यावर मुलांच्या प्रेमासाठी आई-वडील आसुसलेले असतात, पण मुले मोकळी नसतात. व्यवहार ज्ञान बऱ्या पैकी पक्के झालेले असते. त्यामुळे ते आपल्या भावनांना बाधत नाहीत, केवळ प्रॅक्टिकल गोष्टींवर ते जास्त concentrate होतात..
जसजसे वय वाढत जाते तसतसे एकेक गोष्ट सोडण्याचा प्रयत्न जरूर करावा, मुले मोठी झाल्यावर स्वतंत्र असतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत अपेक्षा करणे सोडणे हे केव्हाही चांगलेच. आपणच आपला आनंद शोधणे व वाढत्या वयाबरोबर हळूहळू बऱ्याच गोष्टींना फाटा देणे हे केव्हाही चांगलेच ,त्यामुळे अपेक्षांचे ओझे तर राहणार नाही व त्यामुळे येणारे दुःख पण आपोआप संपेल. मान्य आहे या गोष्टी अवघड आहेत पण तशी मानसिक तयारी जर लवकर ठरवली तर पुढील येणारा काळ हा सुसह्य होईल. बाकी काही नाही, कारण काही असल तरी दोन पिढ्यांतील अंतर , काळ, परिस्थिती, जाणीव, व्यवहाराच्या भाषा , विचार हे बदललेले असतात. ते कायम लक्षात ठेवले तर भावनिक कोंडमारा व त्यातून येणारे नैराश्य हे बऱ्याच अंशीं कमी होते..
संपादक : गटपाडे एन आर
"हॅलो "
"बोल आई"
"अरे, दिवाळी जवळ आली ,केव्हा येतोय?"
"अगं,दिवाळीची बहुतेक लोकांनी सुट्टी घेतली आहे अगोदरच आणि वर्कलोड फार आहे. त्यामुळे कठीण वाटते आहे."
"अरे...पण दिवाळीचे चार दिवस तरी"
" नुकतेच प्रमोशन झाले आहे आई.सध्या तरी नाही जमणार"
"ऑफिसला तर सुट्टीच असणार ना? मग राहून काय करतो?"
"इथले बाकीचे काम उरकून टाकतो.फ्लॅट बघायचा आहे. काही कागदपत्रे अपडेट करायची आहेत."
" म्हणजे दिवाळीलाही नाही येणार?" तिचा स्वर हळवा झाला.
"आई, उगाच इमोशनल नको होऊ.दिवाळीनंतर मला चांगली आठवडाभराची रजा मिळणार आहे.बॉसनेच सांगितले.मग येऊन राहिल निवांत गावी."
***
तिने लेकीला फोन लावला.
"हॅलो"
" आई आता तुलाच फोन लावणार होते"
"का गं?"
"ह्यावेळी दिवाळीला येणे कठीण आहे ग."
"का?"
"प्रोजेक्ट सबमीट करायचा आहे गं."
"तो तर पुढच्या महिन्यात करायचाय ना?"
"हो .पण आता शेवटचा हात फिरवायचा आहे. सर म्हणाले आता सगळे होत आले आहे तर लिंक तोडू नको. "
"अग पण चार दिवसांनी असा कोणता मोठा फरक पडणार आहे?"
"प्लीज आई,आग्रह करू नको. प्रोजेक्ट झाला की मी महिनाभर येऊन राहिल हवी तर."
****
मुले येणार नसल्याने निराश मनस्थितीत तिला नीट झोप लागलीच नाही. पण नेहमीच्या सवयीने पहाटे जाग आली. बाहेर आली तर देवघरातला लाईट चालू होता. काल रात्री तर आठवणीने बंद केला होता.ती घराबाहेर आली. अजून अंधारलेलंच होते. बघते तर घराचे अंगण स्वच्छ झाडून सडा घालून ठेवलेले होते. घराबाहेरच्या कुंपणाच्या कोपऱ्यावर एक पणतीही लावलेली. तेवढ्यात धूमधडाम आवाज आला. तिने घाबरून कान बंद केले तसा रस्त्यावरून हसत हसत तिचा नवरा आला.
" तुला उठवण्यासाठीच एटमबाँब लावला तर तू आधीच उठलेली. "
"काय हे? ह्या वयात शोभत का फटाके उडवणे? शेजारीपाजारी काय म्हणतील?"
"काय म्हणतील? म्हणतील की म्हाताऱ्याचे डोके फिरले" तिचा नवरा पुन्हा हसत म्हणाला.
" आणि एवढ्या थंडीचे बनीयन बर्म्युडावर काय फिरताय? थंडी बाधेल. चला आत मी चहा ठेवते."
"चहा झाला आहे माझा. तुझाही ठेवला आहे.चहा पी आणि लवकर आटप .आपण गणपतीच्या दर्शनाला जाऊन येऊ."
ती दोघे निघाली तेव्हा मस्त गुलाबी थंडी पडली होती.सकाळची वेळ असूनही बाजार भरत चालला होता. इतक्या सकाळीही काही खरेदीदार लगबगीने जात होते. दुकाने सजवली जात होती. गणपतीचे दर्शन घेऊन येतांना तिच्या नव-याने गजरा घेतला. एरवी तिने "कशाला या वयात गजराबिजरा" म्हणून विरोध केला असता. पण आज तिने आवडीने तो अर्ध्या पांढऱ्या झालेल्या केसात माळला. तिला अगदी प्रसन्न वाटत होते. ती मनाशीच म्हणाली.....
आपला आनंद आपणच शोधायचा.
खरे तर हे एक साधे उदाहरण , पण ज्या वेळेस आयुष्याची पाने पिवळी होऊ लागतात व एक पोकळी निर्माण होते त्यावेळेस मुलांचा सहवास हवाहवासा वाटतो नेमके त्याच वेळेस मुले अनेक सबबी सांगून गोष्टी टाळतात may be त्यांच्या बाबतीत ते योग्य असेलही , पण आपले मन ते ACCEPT करत नाही , कारण मन हळवे झालेले असते , आयुष्यात बऱ्याच खस्ता खाऊन झाल्यावर मुलांच्या प्रेमासाठी आई-वडील आसुसलेले असतात, पण मुले मोकळी नसतात. व्यवहार ज्ञान बऱ्या पैकी पक्के झालेले असते. त्यामुळे ते आपल्या भावनांना बाधत नाहीत, केवळ प्रॅक्टिकल गोष्टींवर ते जास्त concentrate होतात..
जसजसे वय वाढत जाते तसतसे एकेक गोष्ट सोडण्याचा प्रयत्न जरूर करावा, मुले मोठी झाल्यावर स्वतंत्र असतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत अपेक्षा करणे सोडणे हे केव्हाही चांगलेच. आपणच आपला आनंद शोधणे व वाढत्या वयाबरोबर हळूहळू बऱ्याच गोष्टींना फाटा देणे हे केव्हाही चांगलेच ,त्यामुळे अपेक्षांचे ओझे तर राहणार नाही व त्यामुळे येणारे दुःख पण आपोआप संपेल. मान्य आहे या गोष्टी अवघड आहेत पण तशी मानसिक तयारी जर लवकर ठरवली तर पुढील येणारा काळ हा सुसह्य होईल. बाकी काही नाही, कारण काही असल तरी दोन पिढ्यांतील अंतर , काळ, परिस्थिती, जाणीव, व्यवहाराच्या भाषा , विचार हे बदललेले असतात. ते कायम लक्षात ठेवले तर भावनिक कोंडमारा व त्यातून येणारे नैराश्य हे बऱ्याच अंशीं कमी होते..
संपादक : गटपाडे एन आर
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील