सोमवार, २२ जून, २०१५

1. आवडती मैत्रीण …

                       
वाटल जेंव्हा आयुष्यातील आता सर्व काही सरल… 
जेंव्हा आवडणाऱ्या मैत्रिणीच लग्न ठरलं … 

म्हणाली चांगल्या जीवनसाथीसाठी नवस करायला गेले होतो …. 
जर चांगला जीवनसाथी  हवा होता तर आम्ही काय मेलो होतो?

टेम्पररी नोकरीमुळे विचारायचा धीर नाही झाला … 
नंतर नेहमीप्रमाणे कळलं की आता फार उशीर झाला … 

आता दररोज हिचं  फक्त नावारापुराण  …. 
दुस-या  पुरुषाची स्तुती ऐकूण  आम्ही झालो पुरते हैरान … 

मग एके दिवशी आम्हांला त्याचं दर्शन घडलं …. 
विचार नुसता करत राहिलो की , हिने ह्याच्यात काय पाहिलं …. 

एक कायमची नोकरी लग्नासाठी पुरेशी असू शकते?
सुरक्षिततेची भावना सगळ्यात मोठी ठरू शकते… 


शेवटी स्वीकार केला आम्ही, नशिबाची चाल आहे तिरकी … 
प्रेमासारख्या नाजूकबाबतीतही दैवाने घेतली आमची फिरकी …  

दोन वर्षानंतर रस्त्यात पुन्हा ती भेटली …. 
हसायलाही पैसे पडतात याची आम्हाला खात्री पटली … 

प्रेमाचे आम्ही विसरून गेलो 
पण आता मैत्रीही शाबूत नसते … 

कारण आपणासोबत असणारी काही क्षणांची मैत्रीण 
ही अनंत काळासाठी तिच्या नवऱ्याची पत्नी असते … 

लेखक - अज्ञात 

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------



2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...