वाटल जेंव्हा आयुष्यातील आता सर्व काही सरल…
जेंव्हा आवडणाऱ्या मैत्रिणीच लग्न ठरलं …
म्हणाली चांगल्या जीवनसाथीसाठी नवस करायला गेले होतो ….
जर चांगला जीवनसाथी हवा होता तर आम्ही काय मेलो होतो?
टेम्पररी नोकरीमुळे विचारायचा धीर नाही झाला …
नंतर नेहमीप्रमाणे कळलं की आता फार उशीर झाला …
आता दररोज हिचं फक्त नावारापुराण ….
दुस-या पुरुषाची स्तुती ऐकूण आम्ही झालो पुरते हैरान …
मग एके दिवशी आम्हांला त्याचं दर्शन घडलं ….
विचार नुसता करत राहिलो की , हिने ह्याच्यात काय पाहिलं ….
एक कायमची नोकरी लग्नासाठी पुरेशी असू शकते?
सुरक्षिततेची भावना सगळ्यात मोठी ठरू शकते…
शेवटी स्वीकार केला आम्ही, नशिबाची चाल आहे तिरकी …
प्रेमासारख्या नाजूकबाबतीतही दैवाने घेतली आमची फिरकी …
दोन वर्षानंतर रस्त्यात पुन्हा ती भेटली ….
हसायलाही पैसे पडतात याची आम्हाला खात्री पटली …
प्रेमाचे आम्ही विसरून गेलो
पण आता मैत्रीही शाबूत नसते …
कारण आपणासोबत असणारी काही क्षणांची मैत्रीण
ही अनंत काळासाठी तिच्या नवऱ्याची पत्नी असते …
लेखक - अज्ञात
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------