आज पूनम आपल्या वडिलांकडे आली आणि म्हणाली,
“पप्पा, मी माझ्या आवडत्या मुलाशी लग्न केलंय.”
वडील संतापाने लाल झाले पण वडिलांनी फक्त एवढंच सांगितलं,
“माझ्या घरातून निघून जा.”
पूनम म्हणाली, “पापा त्यांना काही काम नाही, आम्हाला सध्या राहू द्या, त्यांना नौकरी मिळाली की मग आम्ही जाऊ .”
पण वडिलांनी एक न ऐकता तिला घराबाहेर काढून टाकलं.
काही वर्षं गेली.
पूनमचे वडील वारले. ज्याच्याशी पूनमच लग्न झालं होत तो ही सोडून गेला. तीच्या वडिलांच्या संपत्ती वर मज्जा मारता येईल म्हणूनच त्यानें लग्न केले होते. पण वडीलांनी हाकलून लावल्यामुळे त्याचा प्लॅन फसून गेला आणि त्यानेही तिला धोका दिला आणि सोडून पळून गेला.
पूनमला एक मुलगा आणि एक मुलगी होती. तिने स्वतःचं हॉटेल सुरू केलं आणि त्यावरच तिचं घर चालू लागलं. जेव्हा वडिलांच्या निधनाची बातमी आली, तेव्हा पूनमच्या मनात पहिला विचार आला.
“बरं झालं गेले . त्यांनी मला घराबाहेर काढलं, त्यांनीच मला दारोदार भटकवलं.”
तिने ठरवलं की ती त्यांच्या अंतिम दर्शनाला ही जाणार नाही.
पण तिचे काका म्हणाले,
“पूनम, चल. जो जाणार आहे तो गेला. आता त्याच्याशी वैर कशाचं?”
पूनमने त्यांचं म्हणणे ऐकलं आणि वडिलांच्या अंत्ययात्रेला जाण्याचा निर्णय घेतला.
ती पोहोचली तेव्हा घरात शेवटच्या विधीची तयारी सुरू होती. तिच्या मनात वडिलांच्या मृत्यूचं काही दुःख नव्हतं. ती फक्त काकाच्या सांगण्यावर आली होती. तेराव्या दिवशी काकांनी तिला वडिलांनी लिहिलेलं एक पत्र दिलं. रात्री तिने ते उघडून वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिलं होतं,
माझ्या गोजिरवाण्या बाहुलीला,
मला माहीत आहे, तू माझ्यावर रागावली आहेस. पण तुझ्या पप्पाला माफ कर.
मला माहीत आहे, मी तुला घराबाहेर काढलं, आणि तू दारोदार भटकलीस.
पण मीही खूप दुःखी होतो… तुला कसं सांगू?
आठवतंय, तू फक्त पाच वर्षांची होतीस तेव्हा तुझी आई आपल्याला सोडून गेली.
किती रडलीस, घाबरलीस... माझ्याशिवाय झोपच लागत नव्हती तुला.
रात्री मी तुझ्यासोबत रडायचो, पण तुला जागं होऊ नये म्हणून अश्रू पुसून बसायचो.
शाळेत जायला तुला भीती वाटायची.
मी तुझ्या शाळेच्या खिडकीबाहेर तासन्तास उभा असायचो आणि सुट्टी झाल्यावर तुला मिठी मारायचो.
तुला न आवडणारं अर्धकच्चं अन्न मी परत टाकून नवं बनवायचो, फक्त तू उपाशी राहू नये म्हणून.
तुला ताप आला की दिवसभर तुझ्या शेजारी बसून असायचो, आतून रडायचो, पण तुला हसवायचो.
दहावीच्या परीक्षांसाठी तू रात्रभर अभ्यास करायचीस, तर मीही रात्रभर तुला चहा करून द्यायचो.
कॉलेजात तुझी छेड काढणाऱ्या मुलांशी मी भांडलो. वय झालं होतं, अंगात ताकद नव्हती,
पण प्रत्येक मुलीच्या डोळ्यात वडील हे हिरो असतात, म्हणून मी वेदना सहन केल्या.
तुझे पहिले जीन्सचे कपडे, तो लहान स्कर्ट, ती गाडी.
सगळा समाज विरोधात होता, पण मी तुझ्या आनंदात अडथळा आणला नाही.
उशीरा घरी येणं, कधी पिणं, डिस्को, मुलांबरोबर फिरणं.
हे सगळं मी कधी लक्षातच घेतलं नाही, कारण त्या वयात असं होतंच.
पण एक दिवस तू एका मुलाशी लग्न केलंस,
ज्याच्याबद्दल तुला काहीच माहिती नव्हती.
मी त्याची चौकशी केली… किती मुलींना त्याने फसवलं होतं !
पण तू प्रेमात आंधळी झाली होतीस आणि मला विचारायनही तुला गरजेचं वाटलं नाही
माझी स्वप्नं होती, तुला पालखीत बसवायचं, चंद्रासारखं सजवायचं,
लग्नात इतका थाट करायचा की लोक म्हणतील — “शर्माजींची मुलगी बघा, किती लाडाने वाढवली आहे!”
पण तू माझी सगळी स्वप्नं चुरगळलीस.
बाहुली, कपाटात तुझ्या आईचे दागिने आहेत आणि तुझ्या लग्नासाठी घेतलेले दागिनेही.
तीन-चार घरे आणि काही जमिनी तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या नावावर आहेत.
बँकेत थोडे पैसे ठेवले आहेत, ते काढून घे.
शेवटी एवढंच सांगीन — मी तुझा शत्रू नव्हतो, मी तुझा बाप होतो.
तुझी आई गेल्यावर दुसरं लग्न केलं नाही, लोकांचे टोमणे सहन केले,
अनेक संबंध नाकारले, फक्त तुझ्या मनाला दुसऱ्या आईचा स्पर्श लागू नये म्हणून.
तू लग्नाच्या पोशाखात घरात आलीस तो दिवस —
मी पहिल्यांदाच पूर्ण मोडलो.
तुझ्या आईच्या मृत्यूनंतरही मी एवढा रडलो नव्हतो, जितका त्या दिवशी रडलो.
त्यानंतर रोज रडलो… समाज काय म्हणेल म्हणून नव्हे,
तर माझ्या लाडक्या बाहुलीने आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेताना
एकदाही मला विचारलं नाही म्हणून.
आता तू पण आई आहेस, तुला कळेल मुलाच्या आनंद-दुःखाचं मोल…
आणि मन तोडलं तर किती वेदना होतात.
देव करो, तुला ही वेदना कधी जाणवू नये.
तुला मोठं दुःख देणारा वडील म्हणून मला माफ कर, बाहुली.
इथे पत्र थांबवतो… शक्य असेल तर माफ कर.
---
पूनमने पत्रासोबत ठेवलेलं आपलं लहानपणीचं चित्र पाहिलं —
त्यावर तिने लिहिलं होतं, “I love you my father, my hero, I will obey your everything.”
पूनम रडत होती.
तेव्हा काका आले आणि म्हणाले,
“पूनम, तुला रेस्टॉरंट सुरू करायला, घर घ्यायला जी रक्कम दिली, ती तुझ्या वडिलांनीच दिली होती.
मुलं कितीही वाईट असली तरी आई-वडील वाईट नसतात.
मुलांनी आई-वडिलांना सोडलं तरी, ते मृत्यूनंतरही मुलांच्या भल्यासाठीच प्रार्थना करतात.”
पूनमच्या वडिलांना शांती मिळाली की नाही माहीत नाही पण ते पत्र वाचल्यानंतर पूनमला आयुष्यभर शांती मिळणार नाही.
---
फक्त एवढंच सांगायचं आहे, मित्रांनो
लग्न प्रेमाचं असणं चुकीचं नाही,
पण त्यात आई-वडिलांचा होकार सामील करा.
पाणी दगडातूनही निघतं, पण ते पालक असतात.
मुलांच्या आनंदासाठी ते किती दिवस मोडून जगतील?
प्रत्येक बापाची इच्छा असते,
आपल्या मुलीला स्वतःच्या हाताने विदा करण्याची.
शक्य असेल तर ते स्वप्न अपूर्ण ठेवू नका. 🌿🌿
(लेखक अनामिक)