निरनिराळ्या क्षेत्रात जिगर, मस्ती, कैफ, झिंग व अजब रसायनाने भरलेली माणसे जन्माला येतात. सामन्यातून असामान्य झालेली ही व्यक्तिमत्वे, यांच्या कामातून कुठे अनेकांचे प्रश्न सोडवले जातात, कुठे न्याय मिळवून दिला जातो तर कुठे शक्ती-बुद्धीचा मिलाफ होऊन नवनिर्माण घडते. या अवलियांचे एखादे वाक्य देखील अनेकांना स्फूर्ती देतात, जगण्याची उमेद वाढवतात, अनेकांचे जीवनमान बदलतात. या प्रतिभावंतांचं जगच निराळं. जगाला त्यांनी पादाक्रांत केलेली शिखरे दिसतात. परंतु ही शिखरे गाठताना त्यांनी शोधलेल्या वाटा, त्यावरचे दगडधोंडे, खाचखळगे, बोचलेले काटे, रक्ताळलेली पावले लोकांना दिसत नाही. अशीच काही अवलिये ज्यांनी जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य केलेले आहे :
01) भग्वद्गीतेवर अपार श्रद्धा असणारा भगतसिंग फासावर जाण्यापूर्वी गीतापठण करत होता. जेलरने विचारले, "तुझं हे गीतापठण कधी संपणार?" राष्ट्रभक्तीवर प्रखर श्रद्धा असणारा भगतसिंग बाणेदारपणे उत्तर देतो, "पुढच्या जन्मी." त्यावेळेस जगाला भगवद्गीतेच्या पावित्र्याचा व राष्ट्रभक्तीचा प्रत्यय येतो.
02) विलक्षण प्रतिभा घेऊन जन्माला आलेले श्रीमान योगीकार रणजित देसाई, ययातीकार वि. स. खांडेकर, द दा विंची कोडचे डॅन ब्राऊन, सिंहासनाधिष्ठ अरुण साधू, धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे आश्विन सांघी, तरुण पिढीला भुरळ घालणारे प्रतिपश्चन्द्रकार डॉ. प्रकाश कोयाडे यासारखे अनेक लेखक जगभरातील लोकांना वाचण्याचे वेड लावतात, तेव्हा 'वाचाल तर वाचाल' याचे महत्व कळते.
03) "पाच हजार वर्षानंतर दानशूर कर्णाने शिवाजी सावंतांच्या रूपाने पुनर्जन्म घेऊन 'मृत्युंजय'द्वारे आपली व्यथा मांडली" असं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस शिवाजी सावंतांना ज्ञानपीठ पुरस्काराऐवजी हा पुरस्कार सर्वोच्च असल्याचे जाणवते.
04) विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडणारे 'गॉडफादर'चे लेखक मारिया पुझो यांचे पहिल्या पानावर असलेले 'Behind every great fortune there is a crime.' हे वाक्य लोक वाचतात तेव्हा त्यांना प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे काळे वलय दिसते, यातच गॉडफादरचे यश दिसून येते.
05) अद्यापही त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत आणि कदाचित भावी काळातही ते अबाधित राहतील. परंतु अनेकदा आऊट नसूनही अंपायर सचिन तेंडुलकरला आऊट देतात, तेव्हा किंचितही त्रागा न करता तो अतिशय शांतपणे व नम्रतेने मैदान सोडतो. त्याचा हा नम्रपणा बघून तमाम भारतीयांकडून त्याला भारतरत्न देण्याची मागणी होते.
06) सर्वोच्च शिखर सर करण्यास अनेक वेळेस अपयश येऊनही एडमंड हिलरी एखाद्या पहाडासारखा त्या बलाढ्य माउंटनसमोर उभा राहून म्हणतो, ''As a mountain you can't grow but as a human being I can." ही दुर्दम्य इच्छशक्ती त्याला पहिला एव्हरेस्टवीर हा किताब बहाल करते.
07) गुरुत्वाकर्षणाचा शोध व भौतिक शास्त्राची व्याख्या बदलणारा जगप्रसिद्ध शास्रज्ञ न्यूटन जेव्हा मांजरीसाठी एक मोठे व तिच्या पिलांसाठी एक छोटे अशी दोन छिद्रे ठेवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो घराघरात पोहचतो.
08) तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचा सुवर्ण चषक हातात घेऊन उंचावलेल्या पेलेला विचारणा होते, "आपल्या यशाचे गमक काय आहे," तेव्हा पेले नम्रतेने म्हणतो, "फुटबॉल हा खेळ ब्राझिलियन्सच्या नसानसात भिनलेला आहे. त्यामुळे या देशात लहान मूल चालायला शिकण्यापूर्वी किक मारायला शिकतं." त्याचे स्फूर्ती देणारे हे वाक्य जगभरातून चर्चिले जाते तेव्हा ब्राझिलियन्स म्हणतात, "स्वर्गात गॉड आहे व ब्राझीलमध्ये पेले आहे."
09) हॉकी सम्राट मेजर ध्यानचंदच्या स्टिकचे अनेक तुकडे करून फोरेन्सिक लॅबला चेकिंगसाठी पाठवतात (अर्थात त्यात काहीही सापडत नाही) व खेळण्यास दुसरी स्टिक देतात. तरीही ध्यानचंद मिळेल त्या स्टिकने भारताला सलग तीन वेळेस ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळवून देतो, त्यावेळेस भारतीय जनताच नव्हे तर जगभरातले व जर्मनीचे तमाम रहिवासी अगदी हिटलरसह त्याच्यासमोर नतमस्तक होतात.
10) अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला पॉल म्युनी अनेक चित्रपटांतून असामान्य भूमिका करून ऑस्कर विजेता होतो. आयुष्याच्या उत्तरार्धात मरणासन्न अवस्थेत असताना त्याचा मित्र त्याला एक भले मोठे पुस्तक भेट देतो, तेव्हा केविलवाणे हसत तो म्हणतो, "मित्रा, हे पुस्तक मी वाचणे तर सोड पण ते आता उचलूही शकत नाही." ते पुस्तक म्हणजे इंग्लिश डिक्शनरीची नवीन आवृत्ती असते. त्यातील पहिल्या पानावर खूण केलेला शब्द मित्र त्याला दाखवतो. तो शब्द असतो 'actor' आणि त्याच्यासमोर त्याचा अर्थ असतो पॉल म्युनी. ते वाचून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात, हुंदका दाटून येतो व म्हणतो, "तुझी ही गिफ्ट हजारों ऑस्करला मागे टाकेल इतकी अनमोल आहे. आता मी सुखाने प्राण सोडायला मोकळा झालो."
11) मिल्खासिंगने पळण्याचा शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर, पंतप्रधानांनी, "He didn't run, he flew," असं म्हटल्यावर मिल्खासिंगला पदकापेक्षाही आपल्या जीवनाचे ध्येय गाठल्याचा आनंद मिळतो.
12) महान क्रिकेटटू डॉन ब्रॅडमन खेळत असताना समालोचक म्हणतात, "He is in." तेव्हा he कोण आहे हे सांगण्याची गरज नसते. तो आऊट होतो तेव्हा ब्रॅडमन पॅव्हिलिअनमध्ये पोहचण्यापूर्वी सर्व प्रेक्षक स्टेडियम सोडून विषण्ण अवस्थेत बाहेर पडतात, तेव्हा क्रिकेटची झिंग काय असते हे जगाला कळतं.
13) फ्रान्समधील लूव्हर संग्रहालयातून जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र चोरीस गेल्यानंतर संपूर्ण देश आक्रंदन करतो. प्रथमच या देशाचा झेंडा अर्ध्यावर उतरवला जातो, तेव्हा लिओनार्दो दा विन्सी हा काय अवलिया आहे, हे जगाला कळते. तोच चोर पश्चातापदग्ध होऊन ते चित्र परत आणून देतो तेव्हा समस्त जनता त्याला माफ करते. तद्नंतर अशी आख्यायिका आहे की लिओनार्दो पुनर्जन्म घेऊन चोर झाला व त्यानेच त्याचे चित्र पळवले व जगाला मोनालिसाचे गूढ हास्य (अद्यापही न उलगडलेले) दाखवून दिले.
14) तत्कालीन पंतप्रधान जेव्हा "कैसा दिखा रहा है हमारा देश" असं विचारतात तेव्हा राकेश शर्मा अवकाशातून 'सारे जहाँसे अच्छा हिंदुस्थान हमारा' असे उत्तर देतो, त्यावेळेस त्याच्या एका वाक्याने संपूर्ण देशभरात राष्ट्रप्रेमाची भावना उसळते.
15) जगज्जेता सिकंदर एका फकिराला विचारतो, "तुला काय हवंय ते सांग." तेव्हा शांतपणे तो फकीर म्हणतो, "माझे ऊन अडवून उभा आहेस, थोडा बाजूला हो." अशावेळेस जगाला स्वाभिमानाची भाषा समजते.
अशा असामान्य व्यक्तींना उदयास्त असतात व इतरांना जन्म-मृत्यू असतात. निरनिराळ्या क्षेत्रात असूनही, त्यांच्या बोलण्यात असलेले एक समान वाक्य, "आमच्या मनातून वाहणाऱ्या विचारधारा, देशासाठी आमच्याकडून झालेले कार्य हे आम्ही निर्माण करत नव्हतो तर ते आमच्यातून आपोआप वाहत होते. त्या निर्गुण-निराकार, नित्य-निरवयव, अनादि-अनंत परब्रह्माच्या कृपेने हे शक्य झाले."
त्यांची ही एकवाक्यता जगभरातील लोकांना सर्व शक्तिमान ईश्वरापुढे नतमस्तक करते.
01) भग्वद्गीतेवर अपार श्रद्धा असणारा भगतसिंग फासावर जाण्यापूर्वी गीतापठण करत होता. जेलरने विचारले, "तुझं हे गीतापठण कधी संपणार?" राष्ट्रभक्तीवर प्रखर श्रद्धा असणारा भगतसिंग बाणेदारपणे उत्तर देतो, "पुढच्या जन्मी." त्यावेळेस जगाला भगवद्गीतेच्या पावित्र्याचा व राष्ट्रभक्तीचा प्रत्यय येतो.
02) विलक्षण प्रतिभा घेऊन जन्माला आलेले श्रीमान योगीकार रणजित देसाई, ययातीकार वि. स. खांडेकर, द दा विंची कोडचे डॅन ब्राऊन, सिंहासनाधिष्ठ अरुण साधू, धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे आश्विन सांघी, तरुण पिढीला भुरळ घालणारे प्रतिपश्चन्द्रकार डॉ. प्रकाश कोयाडे यासारखे अनेक लेखक जगभरातील लोकांना वाचण्याचे वेड लावतात, तेव्हा 'वाचाल तर वाचाल' याचे महत्व कळते.
03) "पाच हजार वर्षानंतर दानशूर कर्णाने शिवाजी सावंतांच्या रूपाने पुनर्जन्म घेऊन 'मृत्युंजय'द्वारे आपली व्यथा मांडली" असं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस शिवाजी सावंतांना ज्ञानपीठ पुरस्काराऐवजी हा पुरस्कार सर्वोच्च असल्याचे जाणवते.
04) विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडणारे 'गॉडफादर'चे लेखक मारिया पुझो यांचे पहिल्या पानावर असलेले 'Behind every great fortune there is a crime.' हे वाक्य लोक वाचतात तेव्हा त्यांना प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे काळे वलय दिसते, यातच गॉडफादरचे यश दिसून येते.
05) अद्यापही त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत आणि कदाचित भावी काळातही ते अबाधित राहतील. परंतु अनेकदा आऊट नसूनही अंपायर सचिन तेंडुलकरला आऊट देतात, तेव्हा किंचितही त्रागा न करता तो अतिशय शांतपणे व नम्रतेने मैदान सोडतो. त्याचा हा नम्रपणा बघून तमाम भारतीयांकडून त्याला भारतरत्न देण्याची मागणी होते.
06) सर्वोच्च शिखर सर करण्यास अनेक वेळेस अपयश येऊनही एडमंड हिलरी एखाद्या पहाडासारखा त्या बलाढ्य माउंटनसमोर उभा राहून म्हणतो, ''As a mountain you can't grow but as a human being I can." ही दुर्दम्य इच्छशक्ती त्याला पहिला एव्हरेस्टवीर हा किताब बहाल करते.
07) गुरुत्वाकर्षणाचा शोध व भौतिक शास्त्राची व्याख्या बदलणारा जगप्रसिद्ध शास्रज्ञ न्यूटन जेव्हा मांजरीसाठी एक मोठे व तिच्या पिलांसाठी एक छोटे अशी दोन छिद्रे ठेवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो घराघरात पोहचतो.
08) तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचा सुवर्ण चषक हातात घेऊन उंचावलेल्या पेलेला विचारणा होते, "आपल्या यशाचे गमक काय आहे," तेव्हा पेले नम्रतेने म्हणतो, "फुटबॉल हा खेळ ब्राझिलियन्सच्या नसानसात भिनलेला आहे. त्यामुळे या देशात लहान मूल चालायला शिकण्यापूर्वी किक मारायला शिकतं." त्याचे स्फूर्ती देणारे हे वाक्य जगभरातून चर्चिले जाते तेव्हा ब्राझिलियन्स म्हणतात, "स्वर्गात गॉड आहे व ब्राझीलमध्ये पेले आहे."
09) हॉकी सम्राट मेजर ध्यानचंदच्या स्टिकचे अनेक तुकडे करून फोरेन्सिक लॅबला चेकिंगसाठी पाठवतात (अर्थात त्यात काहीही सापडत नाही) व खेळण्यास दुसरी स्टिक देतात. तरीही ध्यानचंद मिळेल त्या स्टिकने भारताला सलग तीन वेळेस ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळवून देतो, त्यावेळेस भारतीय जनताच नव्हे तर जगभरातले व जर्मनीचे तमाम रहिवासी अगदी हिटलरसह त्याच्यासमोर नतमस्तक होतात.
10) अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला पॉल म्युनी अनेक चित्रपटांतून असामान्य भूमिका करून ऑस्कर विजेता होतो. आयुष्याच्या उत्तरार्धात मरणासन्न अवस्थेत असताना त्याचा मित्र त्याला एक भले मोठे पुस्तक भेट देतो, तेव्हा केविलवाणे हसत तो म्हणतो, "मित्रा, हे पुस्तक मी वाचणे तर सोड पण ते आता उचलूही शकत नाही." ते पुस्तक म्हणजे इंग्लिश डिक्शनरीची नवीन आवृत्ती असते. त्यातील पहिल्या पानावर खूण केलेला शब्द मित्र त्याला दाखवतो. तो शब्द असतो 'actor' आणि त्याच्यासमोर त्याचा अर्थ असतो पॉल म्युनी. ते वाचून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात, हुंदका दाटून येतो व म्हणतो, "तुझी ही गिफ्ट हजारों ऑस्करला मागे टाकेल इतकी अनमोल आहे. आता मी सुखाने प्राण सोडायला मोकळा झालो."
11) मिल्खासिंगने पळण्याचा शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर, पंतप्रधानांनी, "He didn't run, he flew," असं म्हटल्यावर मिल्खासिंगला पदकापेक्षाही आपल्या जीवनाचे ध्येय गाठल्याचा आनंद मिळतो.
12) महान क्रिकेटटू डॉन ब्रॅडमन खेळत असताना समालोचक म्हणतात, "He is in." तेव्हा he कोण आहे हे सांगण्याची गरज नसते. तो आऊट होतो तेव्हा ब्रॅडमन पॅव्हिलिअनमध्ये पोहचण्यापूर्वी सर्व प्रेक्षक स्टेडियम सोडून विषण्ण अवस्थेत बाहेर पडतात, तेव्हा क्रिकेटची झिंग काय असते हे जगाला कळतं.
13) फ्रान्समधील लूव्हर संग्रहालयातून जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र चोरीस गेल्यानंतर संपूर्ण देश आक्रंदन करतो. प्रथमच या देशाचा झेंडा अर्ध्यावर उतरवला जातो, तेव्हा लिओनार्दो दा विन्सी हा काय अवलिया आहे, हे जगाला कळते. तोच चोर पश्चातापदग्ध होऊन ते चित्र परत आणून देतो तेव्हा समस्त जनता त्याला माफ करते. तद्नंतर अशी आख्यायिका आहे की लिओनार्दो पुनर्जन्म घेऊन चोर झाला व त्यानेच त्याचे चित्र पळवले व जगाला मोनालिसाचे गूढ हास्य (अद्यापही न उलगडलेले) दाखवून दिले.
14) तत्कालीन पंतप्रधान जेव्हा "कैसा दिखा रहा है हमारा देश" असं विचारतात तेव्हा राकेश शर्मा अवकाशातून 'सारे जहाँसे अच्छा हिंदुस्थान हमारा' असे उत्तर देतो, त्यावेळेस त्याच्या एका वाक्याने संपूर्ण देशभरात राष्ट्रप्रेमाची भावना उसळते.
15) जगज्जेता सिकंदर एका फकिराला विचारतो, "तुला काय हवंय ते सांग." तेव्हा शांतपणे तो फकीर म्हणतो, "माझे ऊन अडवून उभा आहेस, थोडा बाजूला हो." अशावेळेस जगाला स्वाभिमानाची भाषा समजते.
अशा असामान्य व्यक्तींना उदयास्त असतात व इतरांना जन्म-मृत्यू असतात. निरनिराळ्या क्षेत्रात असूनही, त्यांच्या बोलण्यात असलेले एक समान वाक्य, "आमच्या मनातून वाहणाऱ्या विचारधारा, देशासाठी आमच्याकडून झालेले कार्य हे आम्ही निर्माण करत नव्हतो तर ते आमच्यातून आपोआप वाहत होते. त्या निर्गुण-निराकार, नित्य-निरवयव, अनादि-अनंत परब्रह्माच्या कृपेने हे शक्य झाले."
त्यांची ही एकवाक्यता जगभरातील लोकांना सर्व शक्तिमान ईश्वरापुढे नतमस्तक करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा