सुजाता... सुजाता, एक सुंदर पण अबोल मुलगी. वडील पोलिस खात्यामध्ये असल्यामुळे
दर 3-4
वर्षांमध्ये बदल्या होत असायच्या. त्यामुळे ह्या शाळेत 4 वर्षे
मग दुसऱ्या शाळेत 3 वर्षे असे करत तिचं बी.कॉम. पर्यंत
शिक्षण पूर्ण झालं. त्यामुळे तिचे मित्र मैत्रिणी कधीच होऊ शकल्या नाहीत आणि मुलं
स्वभावच अबोल असल्यामुळे स्वत:हून तिनेही मैत्रीसाठी कुठे हाथ पुढे केला नाही.
तिच्या वडीलांची शेवटच्या 10 वर्षांसाठी मुंबईमध्ये बदली
झाली. इथे आल्यावर घरात बसून-बसून ती खूप कंटाळत असायची म्हणून तिच्या वडीलांनी
तिला कॉम्प्युटर कोर्स करायला सांगितला म्हणजे तिचा वेळ पण जाईल आणि थोडं शिक्षण
पण मिळेल. त्याप्रमाणे त्या एरियामध्ये तिला क्लास लावून दिला. ती नियमित क्लासला
जायला लागली. तिथेच तिची ओळख समीरशी झाली. तोही तिथे क्लासला येत होता. तो रहायला
पण तिच्या अगदी घराजवळच होता. समीरने तिच्याशी मैत्री केली. दोघेही एकत्र क्लासला जायला लागले. असे करत-करत
6 महिने उलटून गेले. पण वडीलांबद्दल खूप आदर असल्यामुळे
त्यांच्या मनाविरुध्द काही करायची तिची हिंमत नव्हती. कारण तिच्या वडीलांना तिचं
लग्न उच्चशिक्षित आणि भरपूर पगार असलेल्या मुलाशी करुन द्यायचं होतं आणि समीर
जेमतेम बी.ए. होता. त्याचबरोबर नोकरीचा अजून थांगपत्ता नव्हता. त्यामुळे तिने
समीरला आपला निर्णय त्यावेळी दिला नाही. असाच महिना लोटला आणि अचानक समीरचा फोन
आला की मला नोकरी मिळाली आहे. एका आठवड्यात मला बेंगलोरला जायचं आहे. आणि मला 25000 रुपये पगार मिळणार आहे. आता मी तुझ्या वडीलांशी लग्नाबद्दल बोलू शकतो.
सुजाताला खूप आनंद होतो आणि ती त्याला आपला होकार देऊन टाकते. दोन दिवसांनी समीर
तिच्या घरी येतो. तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. समीर खूप खूश
होऊन तिच्याशी बोलत होता. नोकरीबद्दल सर्वकाही सांगत होता. मी तुझ्या वडीलांशी
बोलतो आणि त्यांना सांगतो की मी सहा महिन्यांची सुट्टी घेऊन परत येईन मग मी
सुजाताशी लग्न करेन. तिलाही खूप आनंद होतो. पण त्या आनंदात काही भलतच घडत. जे घडू
नये असे बरेच काही. कारण घरात त्यावेळी ते दोघेच असतात. सुजाता त्यातून भानावर
येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ती खूप घाबरते आणि रडायला सुरवात करते.
पण समीर तिची समजूत काढतो आणि तिला समजावतो. काही होणार नाही, आपण डॉक्टरांकडे
जाऊया. काही होणार नाही. तू काळजी करु नकोस. असेही आपले सहा महिन्यांत लग्न होणार
आहे. तो तिला मेडिकलमध्ये घेऊन जातो. कुठलीतरी एक गोळी देतो. तू आता काळजी करु
नकोस, काही होणार नाही आणि तो तिला घरात आणून सोडतो व आपल्या घरी जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो. तो बोलतो, की मला काल रात्रीच बेंगलोरसाठी निघावं लागलंय पण तू तुझ्या वडीलांना सांग की सहा महिन्यांत मी येतो आणि आपण लग्न करणार आहोत असे. ती आधी तर खूप घाबरते पण सर्व धीर एकवटून वडीलांशी बोलते. ते म्हणतात की ठीक आहे. मी त्याची वाट बघतोय. सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडीलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बरं वाटतं. ती ही बातमी समीरला कॉल करुन लगेच देते. पण पुढच्या महिन्यांत सर्व काही बदलून जातं. तिला समजून येतं की ती गरोदर आहे. तिला काय करावं काहीच कळत नसतं आणि गेले 8 दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क नव्हता. तिने ते सांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काही केल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतच होती. तिने ठरवलं की समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती मिळाली नाही. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवढ्यात एक मुलगा तिच्याजवळ आला. त्याने तिला रडण्याचे कारण विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले की तो एक नंबरचा धोकेबाज होता. त्याने असेच तुझ्यासारख्या 2-3 मुलींना फसवून इथून पळून गेला आहे. तो बेंगलोरला नाही, दिल्लीला असतो. माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे. मी त्याच्याकडून तिला घेऊन देतो आणि त्या मुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तिने समीरला कॉल केला आणि सर्व सांगितले. त्याने तिला सांगितले की जावून गर्भपात कर. मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस कारण हा नंबर इथून पुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे तिला धक्का बसतो आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते. एकदा विचार करते की घरी सर्व सांगायचं पण वडीलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतो. आणि ती सरळ आपल्या रुममध्ये जाऊन काही कुणाशी न बोलता गळफास लावून घेते आणि हे सर्व संपवून टाकते.
सुजाताचं आयुष्य तर असंच फुकट गेलं
मित्रांनो, पण अशा सुजाता अजून होऊ नये ह्याची दक्षता आपण स्वत:च घेतली पाहिजे...
खास करुन मुलींनी....!!!
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो. तो बोलतो, की मला काल रात्रीच बेंगलोरसाठी निघावं लागलंय पण तू तुझ्या वडीलांना सांग की सहा महिन्यांत मी येतो आणि आपण लग्न करणार आहोत असे. ती आधी तर खूप घाबरते पण सर्व धीर एकवटून वडीलांशी बोलते. ते म्हणतात की ठीक आहे. मी त्याची वाट बघतोय. सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडीलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बरं वाटतं. ती ही बातमी समीरला कॉल करुन लगेच देते. पण पुढच्या महिन्यांत सर्व काही बदलून जातं. तिला समजून येतं की ती गरोदर आहे. तिला काय करावं काहीच कळत नसतं आणि गेले 8 दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क नव्हता. तिने ते सांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काही केल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतच होती. तिने ठरवलं की समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती मिळाली नाही. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवढ्यात एक मुलगा तिच्याजवळ आला. त्याने तिला रडण्याचे कारण विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले की तो एक नंबरचा धोकेबाज होता. त्याने असेच तुझ्यासारख्या 2-3 मुलींना फसवून इथून पळून गेला आहे. तो बेंगलोरला नाही, दिल्लीला असतो. माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे. मी त्याच्याकडून तिला घेऊन देतो आणि त्या मुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तिने समीरला कॉल केला आणि सर्व सांगितले. त्याने तिला सांगितले की जावून गर्भपात कर. मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस कारण हा नंबर इथून पुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे तिला धक्का बसतो आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते. एकदा विचार करते की घरी सर्व सांगायचं पण वडीलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतो. आणि ती सरळ आपल्या रुममध्ये जाऊन काही कुणाशी न बोलता गळफास लावून घेते आणि हे सर्व संपवून टाकते.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा