तरुण शेतकरी
डोंगरवरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेड्यापासून तसा फार
लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ-जाऊ म्हणत जाणं काही झालं
नव्हतं. दिवसभराचं का संपल. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून
कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने...
रात्रीच गावाची सीमा ओलांडली. आमवस्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा. पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेल दहा पावले जाता येईल एवढाच ! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किssर्रssर्र अंधारात एवढासा कंदीत घेऊन चढणे वेडेपणाचे होईल असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहता तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडसं पांघरुन आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्यातरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चटकन उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढ्यात कानावर आवाज आला.
"राम राम पाव्हण... का असं निजलात?" म्हातारा आवाज होता. शेतकऱ्यानं
पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातत लहानसा कंदील
होता. शेतकरी म्हणाला, "राम राम बाबा. उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर
चढून दर्शनाला देवाळात जाईन." म्हातारा हसला... म्हणाला, "अरे, जर डोंगर
चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग
कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?" "एवढ्या
अंधारात कसा चढायचा डोंगर? काय वेड लागलय का तुम्हाला आणि हा
कंदील केवढासा ! अहो, कसंबसं आठ-दहा पावलं पुढचं फक्त दिसतंय
याच्या प्रकाशात." तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला,
"अरे, तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा
चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी
प्रकाश असली तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीची प्रदक्षिणा घालता येते."
म्हाताऱ्याचं बोलणं शेतकऱ्याला पटलं. तो उठला
आणि चालायला लागला आणि कंदीलाच्या प्रकाशात सूर्योदयाच्यापूर्वी देवळात जाऊन
पोहोचलासुध्दा. वाट पाहात बसून कशाला रहायचं.
जो थांबतो तो संपतो. जो चालतो, तो ध्येय गाठतो. कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असू द्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.
रात्रीच गावाची सीमा ओलांडली. आमवस्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा. पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेल दहा पावले जाता येईल एवढाच ! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किssर्रssर्र अंधारात एवढासा कंदीत घेऊन चढणे वेडेपणाचे होईल असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहता तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडसं पांघरुन आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्यातरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चटकन उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढ्यात कानावर आवाज आला.
जो थांबतो तो संपतो. जो चालतो, तो ध्येय गाठतो. कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असू द्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा