शनिवार, २८ जून, २०२५

2022. मी देवाचे आभार मानतो

 माझ्या वडिलांची सवय काहीशी वेगळीच होती.
जेवायला बसले की पहिला घास तोडायचे, मग तो थोडा थाळीभोवती फिरवायचे आणि एका कोपऱ्यात ठेवून संपूर्ण थाळीला नमस्कार करून मग जेवायला सुरुवात करायचे.
मी त्यांचं हे पाहायचे आणि विचार करायचे, वडील असं का करतात?
एक दिवस हिम्मत करून मी विचारलंच,
“बाबा, तुम्ही रोज हा एक घास वेगळा ठेवता आणि थाळीला नमस्कार करता, का?”
वडील हसले.
मग त्यांनी शांतपणे उत्तर दिलं,
“मी जेवण सुरू करण्यापूर्वी देवाचे आभार मानतो बेटा. 🙏
देवाचे आभार की आज मला अन्न मिळालं.
देवाचे आभार की मी ते खाण्यायोग्य आहे.
आणि देवाचे आभार की आजचं अन्न खाण्यासाठी योग्य आहे.”
मी तेव्हा लहान होते, मला हे फारसं कळलं नाही.
माझ्या मनात विचार आला, जेवण तर आईने बनवलं आहे, मग यात देव कुठे आला?🤔
बहुधा वडिलांनी माझ्या डोळ्यांतला प्रश्न ओळखला.
ते म्हणाले,
“अन्न चविष्ट आहे, त्यामुळे तुझ्या आईचे  देखील आभार मानेन हो.”😊
ही गोष्ट कायम लक्षात राहिली. का?
कारण...
ज्या दिवशी आईने शेवटचा श्वास घेतला, त्याआधी तिने हाताच्या इशाऱ्याने वडिलांना जवळ बोलावलं.
ती म्हणाली ,“माझ्या तोंडात तुळशीचं पान आणि थोडंसं पाणी टाका.”
वडिलांनी ते केलं.
त्यांनी पाण्याचा घोट आईच्या तोंडात घातला आणि तेवढ्यात आई हसली…
तिने दोन्ही हात जोडले आणि वडिलांना हळूच “धन्यवाद” म्हटलं.
आई जात होती.
संपूर्ण कुटुंब तिच्या आजूबाजूला होतं.
तिच्या चेहऱ्यावर कुठेही वेदनेचा लवलेश नव्हता.
ती हसतच गेली..
वडिलांचे आभार मानत.
धन्यवाद – एवढे वर्ष साथ दिल्याबद्दल.
धन्यवाद – माझ्या आजारात माझी सेवा केल्याबद्दल.
आईचं जगणं खरंच अद्भुत होतं.
आई गेल्यानंतर आयुष्याबद्दल मला मोहच उरला न्हवता... खूप उदास राहायला लागले मी.
त्या वेळी वडिलांनी मला जवळ बसवून सांगितलं,
“उदास राहू नकोस. आयुष्य समजून घे. तुझी आई तुझ्यासोबत अनेक वर्ष होती, याबद्दल विचार कर.”
ते सांगू लागले,
“माझ्या वडिलांचे जेव्हा निधन झाले, तेव्हा मी फक्त तीन वर्षांचा होतो.”
देवाच्या प्रत्येक निर्णयामागे काही तरी कारण असतं.
आपल्याला त्याचा स्वीकार करायला हवा आणि त्याचे आभार मानायला हवेत.
मी विचारलं,
“आई गेली, यामध्ये आभार कसले?”
त्यांनी माझी डायरी काढून दाखवली.
त्यात मी काही महिन्यांपूर्वी लिहिलं होतं, “हे देवा, माझ्या आईला मृत्यू दे.. तिच्या वेदना मला पाहवत नाहीत आणि तिलाही सहन होत नाहीत.” 😔
वडिलांनी दाखवलं आणि सांगितलं,
“तुझी आई कष्टमुक्त झाली, त्यामुळे देवाचे आभार मानायला हवेत.
या जगात अनेक लोक अनेक असाध्य आजारात फार त्रास सहन करतात.
आईला यातून मुक्ती मिळाली, यासाठीही कृतज्ञता हवी.”
वडिलांनी एकच गोष्ट शिकवली,
आपल्यात मनापासून “धन्यवाद” म्हणण्याची भावना यायला हवी.
आपण निरोगी आहोत.
आपल्याला रोज दोन वेळा अन्न मिळतं.
आपल्याकडे घर आहे, छप्पर आहे.
आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या इतरांकडे नाहीत.
त्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत.
ज्याच्याकडे नाही, त्याबद्दल खंत बाळगण्याऐवजी
“जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहा”  हे शिकणं महत्त्वाचं आहे.
मी कधीच वडिलांना दुःखी पाहिलं नाही.
एकदा विचारलं,
“तुम्ही कधी दुःखी होत नाही का?”
ते फक्त एक ओळ गुणगुणले,
“मुझे ग़म भी उनका अज़ीज है, कि ये उन्हीं की दी हुई चीज़ है...”
त्यांनी सांगितलं,
“घडणाऱ्या गोष्टींना जर तू देवाची योजना मानलीस, तर आयुष्य खूप सोपं होईल.
तुला जर का सवय लागलीना चांगुलपणा शोधायची, तर आयुष्य फार सुंदर होईल.”
कथा संपली... पण शिकवण आयुष्यभरासाठी लक्षात राहीली...
‘धन्यवाद’  मानायला  शिका! 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...