आज सुनीता जरा अस्वस्थपणेच येरझाऱ्या घालत होती. दरवाजाजवळून तीच लक्ष काही केल्या हटत नव्हतं. आज तब्बल 7 वर्ष झाली होती तिच्या भावाने तिच्याकडून राखी बांधून घेतली नव्हती. दरवर्षी प्रमाने ह्याही वर्षी तिने ओवळणीची सर्व तयारी करून ठेवली होती. पण ह्या वर्षी कुणास ठाऊक तिला राहून राहून वाटत होत की माझा भाऊ नक्की येणार म्हणून दुपार टाळून गेली होती पण तरीही कुणाची यायची चाहूल नव्हती. म्हणून ती ताट टेबल वर ठेवून नकळत ती भूतकाळात पोहचली.
सुनीता आणि सुनील दोघे बहीण भावंडं पण एकमेकांवर अतिशय जीव. एकमेकांशिवाय पानही हालायचं नाही दोघांचं. भांडण सुद्धा खूप जास्त व्हायची दोघांची मग जेव्हा सुनीता रडायला लागायची तेव्हा सुनील ला पण रडू यायचं. सुनीता घरात लहान त्यामुळे लाडकी,सुनील पण खूप जीव लावायचा तिला. प्रत्येक रक्षाबंधनाची दोघेजण खूप आतुरतेने वाट बघायचे. सुनीता सुनील कडून भांडून गिफ्ट काढायची. दोघांच्या धिंगानाने घर कसं गजबजून जाई आणि तसही सुनीता 4 पिढ्यांनंतर मुलगी जन्माला आली म्हणून घरात सर्वांची खूप जास्त लाडकी होती. तिचे पूर्ण लाड, हट्ट पुरवले जायचे. सुनील तिचे सर्व हट्ट कसे पूर्ण होतील ह्याची पूर्ण जवाबदारी घायचा. ह्याच लाडी गुलाबीत सुनीता मोठी झाली. सुनिता सुनील सोबत सर्व शेयर करायची तिला तिच्याच कॉलेज मधला म्हणजे सुनील च्या वर्गातला एक मुलगा आवडायला लागला. त्या दोघांचे लपून छापून प्रेम प्रकरण सुरु झालं. रोजच्या भेटी गाठी वाढल्या सुनीलला ह्या प्रकरणाची कुणकुण लागली. तसा तो मुलगा सुनीलचा मित्र असल्यामुळे त्याचे सर्वच पत्ते सुनीलला ठाऊक होते. ह्या असल्या हलकट मुलासोबत तो कधीही सुनीताला राहू देणार नव्हता. कितीतरी मुलींचं आयुष्य त्याने बरबाद केलं होतं त्याने सुनीताला सर्व समजावून सांगितलं पण ती काहीच ऐकत नव्हती तिच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी पडली होती आणि शेवटी एक दिवस ती त्या मित्राचा हात धरून पळून गेली.
हा सुनील साठी आणि त्याच्या घरच्यांसाठी खूप मोठा धक्का होता. ज्या बहिणीवर त्याने एवढा विश्वास ठेवला होता तीच असं करेल हे त्याला वाटलं नव्हतं. त्या धसक्याने तिचे आजोबा अंथरुणाला खिळले ते कायमचेच. घराण्याची खूप बदनामी झाली. सुनील तर कित्येक दिवस घराच्या बाहेरच पडला नव्हता. घरच्यांचे हे हाल हवाल सुनीताला एका मैत्रिणीकडून कळायचे तिलाही खूप वाईट वाटायचं. हळू हळू दिवस जात होते. घरच्यांनी तिच्याशी पूर्ण संबंध तोडले होते. पण तिला माहिती होत तिचा भाऊ काहीही झालं तरी राखीला तिच्याकडे येणारच. ती दर राखीला सर्व तयारी करून सुंदर राखी घेऊन यायची आणि सकाळ पासून आपल्या भावाची वाट बघत बसायची. तिने एक दोन वेळा फक्त सुनील साठी राखी ला घरी जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण घरच्यांनी तू आमच्या साठी मेली म्हणून सांगितलं आणि सुनील कुठे आहे ते सुद्धा त्यांनी तिला सांगितलं नाही. इकडे सुनील कॉलेज सोडून सैन्य दलात भरती झाला होता. त्याने सुद्धा कधी तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही. पण त्याला सुद्धा राखीच्या दिवशी तिची खूप आठवण यायची. स्वतः च्या रिकाम्या मंगटाकडे बघून तो मूक अश्रू ढाळायचा. त्याला माहिती होत काही नाही तरी राखीला तरी ती नक्कीच आपली वाट बघत असणार. पण तिने केलेल्या कृत्यामुळे तो अजूनही तिला माफ करू शकला नव्हता. इकडे काही वर्षा तच सुनीताला तिच्या नवऱ्याचं खरं रूप समजायला लागलं तो दारू पिउन तिला मारहाण करायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घायचा. तीच घराबाहेर निघणं त्याने बंद करून टाकलं होतं. तिचा फोन सुद्धा स्वतः कडे ठेवून घेतला रोज रोजच्या त्रासाला ती कंटाळली होती. हा तोच का ज्याच्यासाठी आपण आपलं माहेर गमावलं. लाडका भाऊ दूर केला. तिला खूप पश्चयाताप होत असे. रोज देवाकडे सुनील साठी ती प्रार्थना करत असे कि एका रक्षाबंधानाच्या वेळी तरी तो माझ्याकडे येऊ दे. मला त्याची माफी मागायची आहे परत त्या लोकांमध्ये जायचं आहे म्हणून अशीच बघता बघता सात वर्षे उलटली.
सुनीता आता 3 लेकरांची आई झाली होती तिने स्वतः ला थोडं सावरलं होत ,तिचा नवरा अजूनही तसाच होता ती आता त्याच्याकडे लक्ष देत नसे पण तो तरीही तिला त्रास द्यायचा. त्या वेळी तिला तिच्या भावाची खूप आठवण यायची. तो कुठे असेल ? कसा असेल?; काय करत असेल? असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात यायचे.नेहमी प्रमाणे ह्याही वर्षी तिने बाजारात जाऊन सुनील साठी मस्त राखी आणली होती. त्याच्या आवडीचे पदार्थ तीने केले होते आणि औक्षणाचं ताट तयार करून ती करूनतेने दरवाजाकडे एकटक बघत बसली होती. तिच्या नवऱ्याला ह्या गोष्टीचा खूप राग यायचा. तो तिला म्हणाला ,"काही कुणाची वाट नको बघुस ,तो ह्याही वर्षी येणार नाही " असं म्हणून त्याने एक सणसणीत लात तिच्या पोटात घातली. ती धाडकन जाऊन भितीवर आदळली आणि डोक्यातून थोडं रक्त यायला लागलं त्याही परीस्थितीत तिला 'खात्री होती कि ह्या वर्षी तिचा भाऊ नक्की येणार. तिचा नवरा तिला तिथेच सोडून बाहेर जायला निघणार तोच दरवाजा वाजला. नवरा दरवाजा उघडायला तयार नव्हता. आता दरवाजा जोरजोरात वाजू लागला आणि अचानक काही कळायच्या आत बाहेरून दरवाजाला जोरात धक्का बसला आणि दरवाजा निघून पडला. ती कसतरी सावरत उभी राहिली तिला दरवाजा मध्ये सुनील दिसला. धिप्पाड झालेला पिळदार शरीर,अंगावर आर्मीचा ड्रेस आणि चेहऱ्यावर रागीट भाव. सुनीता त्याला काही बोलणार तोच तो तिच्या नवऱ्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याला बदडबदड बदडल आणि धमकी दिली की मी आता परत आलोय माझ्या बहिणीला न्यायला. इथून पुढे तुझा आणि तिचा संबंध संपला. माझ्या बहिणीकडे डोळे वर उचलून जरी बघितल तरी तुझी काही खैर नाही. त्याच्या त्या रौद्र रुपाला घाबरून सुनीताला नवरा शेपूट घालून बसला. सुनीता देखील क्षणभर घाबरलीच. पण लगेच दुसऱ्या क्षणाला सावरून तिने त्याला प्रेमाने औक्षण केलं आणि तीच्या अश्रूंचा बांध फुटला. कितीतरी वेळ ती नुसतं रडत होती. तिला कितीतरी प्रश्न त्याला विचारायचे होते. तक्रार करायची होती. गप्पा मारायच्या होत्या ,पण तो म्हटला ,"आधी तू बॅग भर आणि इथून चाल आपल्या घरी तुला कायमच घरी नेण्यासाठी मी आलो आहे. मला कळलं तुला त्या माणसाने किती त्रास दिला ते. पण मी आर्मी मध्ये असल्यामुळे जास्त दिवस सुट्टीवर येऊ शकत नव्हतो त्यामुळे यायचो आणि लगेचच जायचो प्रत्येकवेळी तुझी आठवण यायची. तुझी नेहमी काळजी लागून राहायची. तुझ्या बद्दल प्रत्येक गोष्ट मला कळायची. माझा मित्र सर्व माहिती द्यायचा तुझ्या बद्दल. ह्या वेळी मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी तुला ह्या नरकातून बाहेर काढायचं. मी मुद्दाम रक्षा बंधानाच्या वेळी सुट्टी घेतली होती. आपलं 7 वर्षाचं रक्षाबंधन एकत्र साजर करायच आहे मला. आई बाबा ला मी समजावतो तू काळजी नको करुस. माझा जसा राग निवळलाय तसा त्यांचा पण निवळला असेलआणि नसेल तर मी आहे काळजी नको करुस "हे ऐकल्यावर सुनीता खूप खुश झाली कितीतरी वर्षांनी ती तिच्या आईबाबांना भेटणार होती.
सर्व तयारी करून ती सुनील सोबत त्यांच्या घरी गेली तिला आणि सुनीलला एकत्र बघून सर्वाना खूप जास्त आनंद आणि आश्चर्य वाटलं की दोघे एकत्र कसे आणि सुनील असा अचानक कसा काय सुट्टीवर आला म्हणून. सुनीलने त्यांना सर्व प्रकरणाची माहिती दिली आणि सांगितलं की आज पासून सुनीता आपल्या सोबतच राहणार आहे मी तिला माफ केले आहे तुम्ही सुद्धा सर्व जण तिला मोठया मनाने माफ करा. आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपली लक्ष्मी आपल्या कडे परत आली आहे तिचा स्वीकार करा तिला लाथाडू नका. सर्वांनी मग सुनीताला माफ करून घरात घेतले. सुनीताने सर्वांना औक्षण करायला सुरुवात केली. जेव्हा ती सुनीलकडे वळली तेव्हा डोर बेल वाजली आणि अचानक ताटातील निरंजन विझला हा कसला तरी अशुभ संकेत आहे असं तिला वाटलं. सुनील तिला म्हणाला,
"दिवा हवेनी विझला असेल. दिवा लावून राखी नंतर बांध आधी जाऊन दरवाजा खोल. बघ माझं सामान आलं असेल तो पर्यंत मी वॉशरूम ला जाऊन येतो. तिने ते ताट तसंच ठेवलं आणि दरवाजा खोलायला निघाली. दरवाजा खोलल्यानंतर बाहेर सर्व आर्मी मधले लोक, गाड्या बघून ती बावचाळून गेली. तोच एकजण पुढे आला. आपली ओळख सांगून म्हणाला की आम्ही तुमच्या घरी कालपासून खूप फोन लावले कुणाचेच फोन लागत नव्हते. आपल्या सुनीलला वीरमरण आलयं. काल अचानक झालेल्या दहशतवादयांच्या सोबत झालेल्या चकमकीत त्याला आपले प्राण गमावले लागले. त्याने 4 दहशतवादयांचा खात्मा केला. त्याने त्यांना आपल्या भागात घुसण्यापासून रोखले पण त्याला त्याबदल्यात आपल्या प्राणाची आहुती दयावी. लागली रक्षा बंधानाला त्यांनी सुट्टी टाकली होती पण त्याच्या एक दिवसांपूर्वीच हे असं झालं"
एवढं बोलून त्या माणसाने तिरंगा सुनीताच्या हातात दिला आणि त्या पाठोपाठ पेटीत असलेलं सुनील च शरीर त्याच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याचं पार्थिव बघून सुनीता जमिनीवरच कोसळली. मग इतक्या वेळ आपल्या सोबत होत ते कोण होत हे कुणालाच कळत नव्हतं. सुनीताने पळत जाऊन वॉशरूम चेक केली ,पूर्ण घर शोधलं पण आत कुणीच नव्हतं;
ती धावतच बाहेर आली आणि जोराचा हंबरडा फोडला ,म्हणाली ,"अरे दादा मला त्या नरकातून सोडवून आपल्या माणसात माझ्या माहेरी आणून तू राखी न बांधताच मला ओवाळणी देऊन गेलास रे ".😢 😲😫
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा