मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

2295. पितृदोष

    मोबाईलच्या स्क्रीनवर मुलाचं नाव चमकताच सावित्री दचकली. वर्षानुवर्षे उलटली होती. मुलाने फक्त औपचारिक फोन केले होते. तेही तेव्हा, जेव्हा त्याचे वडील रुग्णालयात मृत्यूशी झुंजत होते आणि त्यांची अंतिम यात्रा सुद्धा त्याने फक्त फोनवरच आटोपली होती.
सावित्रीबाईंनी कॉल उचलला -
“हॅलो बेटा...”
“हॅलो आई, कशी आहेस?”
“मी ठीक आहे दीपक.. तू सांग, कसा आहेस?”
“कुठे आई... सगळं ठीक कुठं आहे...” त्याच्या आवाजात थकवा होता.
“काय झालं रे?”
“आई, हे पितृदोष काय असतं?”
सावित्री चकित झाली-
“पितृदोष? तुला लंडनमध्ये हे कुठून आठवलं? तिकडे पण पंडित असतात  का?”
“अगं आई, तू पण ना... कायम जुन्याच गोष्टी करत बसतेस.” दीपकच्या आवाजात चिडचिड होती.
सावित्री हलक्या स्मिताने म्हणाली -
“हो बेटा, खरं आहे. जसा तू मला सोडून गेलास तशीच आहे मी. तुझ्या जाण्यानंतर त्याच भिंती, तेच अंगण, आणि तेच शांत रिकामेपण माझे साथीदार झालेत.”
“पण अचानक हा प्रश्न का?”
“आई, पप्पा गेल्यापासून बिझनेसमध्ये सतत नुकसान होतंय. मुलांच्या अभ्यासाचंही वाईट चाललंय. मन सतत अस्वस्थ असतं. इंटरनेटवर एका पंडिताशी बोललो. ते म्हणाले आमच्या घरावर पितृदोष आहे. उपाय काशीला होईल आणि त्यांनी खूप मोठी रक्कम मागितली. म्हणून विचारावंसं वाटलं तुला.”
सावित्रीच्या डोळ्यांत पाणी आलं. हळू आवाजात ती म्हणाली -
“बेटा, खरं पितृदोष तो नाही जो ज्योतिषी सांगतात. खरं पितृदोष तो आहे जेव्हा वडील आपलं सगळं आयुष्य मुलांच्या इच्छा पूर्ण करत करत स्वतःला संपवतात. या आशेने की कधीतरी हीच मुलं त्यांचा आधार होतील. त्यांच्या एकटेपणात सोबत उभी राहतील. पण जेव्हा वेळ येते, तीच मुलं डोळे वटारू लागतात. वृद्ध आई-वडिलांना आजारपणात एकटं सोडून देतात. इतकंच नाही, ज्या खांद्यावर बसून त्यांनी लहानपणी आकाश पाहिलं होतं, त्याच खांद्यांना शेवटच्या यात्रेत खांदा द्यायलाही येत नाहीत आणि मग एखादा परका त्यांचा देह स्मशानापर्यंत पोहोचवतो.”
इतकं बोलून ती शांत झाली. फोनच्या दोन्ही टोकांना शांतता पसरली.
“आई… आई…” दीपकचा गळा भरून आला होता.
सावित्रीने डोळे पुसले आणि म्हणाली -
“उपाय विचारलास ना बेटा? याचा एकच उपाय आहे. आपल्या मुलांना फक्त सुख-सुविधा देऊ नकोस, तर वेळ आणि संस्कारही दे. नाहीतर उद्या तेच तुला पितृदोषाबद्दल विचारतील. लक्षात ठेव.”
सावित्री हुंदक्याने रडू लागली आणि दुसऱ्या बाजूनेही हुंदक्यांचे आवाज येऊ लागले. कदाचित उशिरा का होईना, पण त्या दिवशी दीपकला जाणवलं की वडिलांना गमावणं म्हणजे आयुष्याची सर्वात मोठी हानी आहे आणि त्या पोकळीची भरपाई कधीच कुणी करू शकत नाही.
 “आपण आपल्या आई-वडिलांना खरा आधार देतो आहोत का की फक्त सुविधा?”
“आपण आपल्या मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार देतो आहोत का?”

श्री स्वामी समर्थ 🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...