मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

2294. मैत्री म्हणजे नक्की काय ?

 मैत्री म्हणजे नक्की काय? किंवा जिवलग मित्र म्हणजे नक्की कोण? असा प्रश्न अनेकदा अनेकांना पडतो. हल्ली काय आहे ना माणसांच्या गर्दीत असूनही कधी कधी खुप एकटं एकटं वाटतं, का कुणास ठाऊक एकांतात बसून रडावंसं वाटतं ना तेव्हा आपल्याला आठवतो तो हक्काचा खांदा जो आपल्या साठी कायमच आपल्या सोबत असतो तो खरा मित्र.
रक्ताची नाती जिथे साथ सोडतात तिथे आपली परिस्थिती,दिसणं राहणं न बघता आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहते ती खरी मैत्री बाकीचे सगळं मिथ्य आहे. त्यामुळेच हक्काने ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटतं ना तोच आपला खरा जिवलग.
आपल्या मनातील घुसमट भाव भावना व्यक्त व्हायला जिथे अजिबात संकोच वाटतं नाही. आपल्या सुखात दुःखात सगळ्यात अगोदर जो आठवतो तोच खरा जिवलग.
आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. बऱ्याचदा आयुष्यात अनेक चढ उतार येतात. कधी खडतर प्रवास देखील करावा लागतो पण वेळ काळ आणि बदलेली परिस्थिती बघून जी दूर निघून जातात ना ती कधीच आपली नसतात. आपल्यावर प्रेम करणारी माणसं कधीच आपल्याला आपल्या डोळ्यात अश्रू असतांना आपल्याला एकटं सोडून जात नाहीतं.
रोज सोबत असावं, रोजच भेट व्हावी बोलणं व्हावं असं काहीच नसते. खऱ्या मैत्रीमध्ये पण जेव्हाही भेटू ना तेव्हा कडकडून मिठी मारून डोक्यात नकळतपणे पाणी येत ना तोच खरा जिवलग असतो आपला.
म्हणतात की कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवुच नये पण विश्वास आपुलकी हक्क जिव्हाळा आणि प्रेमाच्या बदल्यात आपल्याही परत तेच मिळावं हा जिवलग मैत्रीचा अलिखित नियम असतो. तो मात्र दोन्ही बाजुनी समान निभावल्या गेला तरच मैत्री शेवटपर्यंत टिकते आणि तो ठरवून जाणूनबुजून नाही निभावू शकतं आपण त्यासाठी एकमेकांसाठी प्रेम जिव्हाळा आपुलकी मनातूनच निर्माण व्हायला हवी.
ज्याच्या फक्त खांद्यावरील हाताने लढायला बळ येत मी सोबत आहे तु लढ हे शब्द जगायला बळ देतात. जो आपल्याला दुःखात हक्काने डोकं टेकवायला आणि आनंदात उचलून नाचवायला हक्काचा खांदा देणारा माणूस म्हणजे जिवलग मित्र तोच खांदा अगदी आपल्याला आयुष्याच्या शेवटी स्मशानापर्यंत खांदा देऊन अलविदा करणारा मित्र म्हणजे सच्चा यार.
आणि असा एक तरी जिवलग मित्र प्रत्येकाला असतो किंबहुना असावा.
तुमच पद प्रतिष्ठा रुबाबदार राहणं बघून तुमच्या आजूबाजूला कायम गर्दी असते ती म्हणजे मित्र असतातच असं नाही ना??
तुमच मन भावना तुमचा सहवास ज्यांना मनापासून आवडतो ना तीच खरी तुमची जिवलग मित्र असतात जी तुम्हाला तुमची परिस्थिती कशीही असो कधीच एकटं पडू देतं नाही.
 म्हणून आपल्या आजूबाजूला असणाऱ्यां आपल्या मित्रांशी बोलत रहा त्याला एकटं पडू देऊ नका तो बोरिंग सतत निगेटिव्ह बोलतो रडगाणं करतो म्हणून त्याला इंगोर नका मारू त्याला सकारात्मक करा त्याच्याशी संवाद साधा मी सोबत आहे ही शाश्वती द्या मित्र फक्त हशी मजाक पार्ट्या औटिंग टिंगलटवाळी पर्यंत मर्यादित नसतात तर जिथे तुला एकटं वाटेल तिथे तु न बोलता न मागता मी तुझ्या सोबत असेल तुला कधीच एकटं पडू देणारं नाही ह्या भावना आपल्याप्रति ठेवतो ना तोच खरा जिवलग असतो बाकी सगळा सुखातील फापट पसारा.
काय आहे ना असा हक्काचा खांदा प्रत्येकाला नक्कीच असावा.
ह्या जगात कोणीही एकटं पडू नये कारण एकटेपणा खूप वेदनादायी असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...