९/११ च्या हल्ल्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर मधे कार्यालय असलेल्या एका कंपनीने त्या दिवशीच्या हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे अनुभव मनमोकळेपणाने कथन करता यावे यासाठी एक कार्यक्रम आयोजीत केला.
ती माणस सुखरुप असण्यामागची छोटी, छोटी कारण स्तिमीत करणारी होती.
* चिरंजीवांचा बालवाडीतील पहिला दिवस असल्यामुळे त्या कंपनीचा प्रमुख त्या दिवशी उशिरा आला होता.
* एका रस्ते अपघातामुळे झालेल्या प्रदीर्घ ट्रॅफिक जाम मधे अडकून एक जण उशिरा आला होता.
* एका महाशयांची नेहमिची बस चुकली होती.
* कार्यालयात यायला निघाले, आणि कार स्टार्टच होईना, असे एकाच्या बाबतीत घडले.
* एक सदगृहस्थ इमारतीत प्रवेश करतानाच फोनची बेल वाजली. बोलण्यासाठी बाहेर थांबले, त्यामुळे त्यांना उशिर झाला.
* एक सकाळी सकाळीच बाप झाला.
* एकाला त्यादिवशी लवकर टॅक्सीच मिळाली नाही.
* आणि सगळ्यात मजेदार वाटावी अशी गोष्ट म्हणजे एकाने त्या दिवशी नवीन कोरे बुट पायात घातले. त्याच्या एका पायाला नवीन बुट चावला म्हणून तो बॅंड एड पट्टी घ्यायला औषधांच्या दुकानात थांबला आणि म्हणून तो आज जीवंत होता.
तेव्हापासून जेव्हा मी रहदारीत अडकतो ;
माझी लिफ्टची फेरी चुकते ;
फोन घेण्यात माझा वेळ जातो ;
आणि अशा अनेक गोष्टी जेव्हा मला अस्वस्थ करतात तेव्हा मी एकच विचार करतो तो म्हणजे...
"बेटा, तु या क्षणी जिथे असायला हवा त्या योग्य जागीच आहेस...!!"
ह्या नंतर कधी एखाद्या सकाळी तुमच्या तयारीत घोळ झाला असेल, मुल शाळेचा गणवेश घालायला त्रास देत असतील, वेळेवर कारची किल्ली सापडत नसेल, रस्त्यात सगळे सिग्नल लाल भेटत गेले असतील....
तर रागावू नका,
त्रागा करु नका...
ध्यानात ठेवा....
तुम्ही योग्य वेळी योग्य जागी आहात..!!
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग अथवा घटना घडू दे, जर तुम्ही त्यावेळी तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवला तर तुमचे चांगलेच होणार. मग तुमचे वाईट चिंतणाऱ्यांना कितीही वाईट वाटू दे अथवा तुमचे पाय ओढणाऱ्यांना कितीही पाय ओढू देत, तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकणार नाही. कारण तुम्ही परिस्थितीने आणि अनुभवाच्या प्रसंगाने भक्कम झालेले असता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा