शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

2498. निंदकाचे घर असावे शेजारी

      नुकताच दमून आलेल्या अनुराधा बाईंनी आरामखुर्चीवर बसून डोळे मिटले. तेवढ्यात शेजारची शांती आजी आली. वयाची साठी पार झालेली आजी बोलायला फार कडू होती. सतत आपल्या बोलण्याने एखाद्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकवायाची तिची  सवय होती. पण अनुराधा ला कधीही तिचा त्रागा वाटत नसे. वडीलधारी म्हणून ती तिचा नेहमी आदर करी.
"पाहिलंस अनुराधा गेली तुझी सूनबाई..किती केलेस तिच्यासाठी तरीदेखील आता दिवस बदलताच तुझी साथ सोडली म्हणायची."  शांता आजी म्हणाली
आज अनुराधा फार थकली होती म्हणून खुर्चीवरून उठत ती म्हणाली "काकू जाऊद्या ना तो विषय मी दमली आहे. चहा टाकते .बसा तुम्ही." म्हणत अनुराधा आत गेली.
“मला नको चहा मी आता जाते.. रात्री येईल शतपावली करायला” अस सांगून आजी निघून गेली.
   चहाचे आंदण गॅसवर ठेवत अनुराधाला भूतकाळ आठवला. तिचा मुलगा सुयश नावाप्रमाणेच लहानपणापासूनच हुशार होता . ग्रॅज्युएशन करत असतानाच त्याला त्याच्याच कॉलेजमधील जूनियर स्टूडेंटशी प्रेम झालं.. अनुराधाला त्याचा मित्रांकडून ही गोष्ट कळली पण साध आकर्षणही असेल आणि एखाद्या वर्षात सुयश विसरेल ही असं मानून अनुराधाने दुर्लक्ष केले. आणि सतत तीन वर्षे सरले ...एक दिवस सुयशने अनुराधाला त्या मुली विषयी सांगितले त्या मुलीचे घरातील मंडळी तिचे लग्न लावून देत आहेत आणि ती खूप sharp माईंड आहे ...
    ..
       ....
           ....परत ...
थोडसं थांबत म्हणाला " आई ..आमचे प्रेम आहे एकमेकांवर " अनुराधा ने  थोडा विचार केला व तिला घरी बोलवायला सांगितलं.  संध्याकाळी छान गोबऱ्या गालाची नाकी डोळे नीट बघताच क्षणी  कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी सुंदर होती ती मुलगी . आपल्या मुलासोबत तिची जोडी तिला लक्ष्मी नारायणा सारखी दिसली. मुलीच्या  घरच्यांना अनुराधाने फार समजवले पण ते मंडळी लव मॅरेज साठी तयार झाले नाही शेवटी त्यांनी निर्णय घेतला जर आमच्या मुलीने प्रेम विवाह केला तर तिचा आमच्याशी कुठलाही संबंध नाही .ती आमच्यासाठी आहे नाही बरोबर.   मुलाच्या प्रेमापोटी अनुराधा त्या मुलीला अंगावरच्या कपड्यांवरच आपल्यासोबत घरी घेऊन आली. एकोनविसाव्या वर्षात नुकताच पदार्पण केलेल्या या तरुणीला तिचे करियर सोडून कसे लग्नाच्याबेडीत अडकवायचे आणि लग्न नाही केले तरी एखाद्या मुलीला आपल्या घरात बिनालग्नाचे कसे ठेवायचे. अनुराधाने  फार विचार केला .सुयश आणि त्या मुलीचे लग्न लावून दिले. लग्नाच्या वर्षभरातच अनुराधाला आजी होण्याच सुख प्राप्त झाले .ती मुलगी जबाबदारीसाठी तयार नव्हती. दोघांनाही आपल्या करिअरची चिंता होत होती तेव्हा अनुराधा ने त्यांना समज दिली बाळाची संपूर्ण जबाबदारी मी घेईल तुम्ही चिंता करू नका .प्रेग्नेंसी मध्ये अनुराधा ने सुनबाई चे सर्व कौतुक केले त्या काळातही तिने तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केली .अनुराधाच्या मदतीमुळे  बाळाच्या संगोपणा सोबत सुनबाई ने पोस्ट ग्रॅज्युएशन  मध्ये टॉप केला .सर्व वृत्तपत्रांमध्ये सुनबाई ची चर्चा होती आज स्पर्धा परीक्षा पास करून सुनबाई नी मोठ्या पदाच्या गव्हर्मेंट जॉब मिळवला म्हणून तिच्या कौतुक समारंभ होता . सुनबाईने वकृत्व करताना आपल्या यशाचे श्रेय सासुबाईंना व नवऱ्याला दिले. अनुराधा फार खुश होती पण दुःखाचे कारण असे होते की सुनबाईला पोस्टिंग कुठे मिळेल ती दूरवर गेली तर नातवाचे काय होईल आणि ज्या सुनेला मुलीप्रमाणे वागवलं ती दूर जाताना आपला विचार करणार की नाही?
     यशस्वी झालेल्या मुलीला भेटायला तिचे आईबाप माहेरीची मंडळी आली होती. त्यांनी तिला समारंभातून सरळ जेवणाचे आमंत्रण दिले एवढ्या वर्षाची दुराव्याची पोकळी एका आमंत्रणानेच कोठे भरणार होती पण सुनबाईं नकार देऊ शकली नाही परस्पर माहेरी निघून गेली.
       अनुराधाचे मन आज खूप हेलगावत होते .रात्रीची शतपावली करायला शांती आजीने आवाज दिला. अनुराधाचे बाहेर जाण्याचे मन मुळीच नव्हते  पण आजीच्या सहवासाची सवय झाली होती म्हणून ती निघाली. शांती आजी सवयीप्रमाणे सुनबाई चे गाऱ्हाणे  वदत होती ."अगं अनुराधा तू तुझ्या आरामाच्या दिवसात सर्व विसरून राब राब राबली. कधी भजन कीर्तनात गेली नाहीस की कधी गावी लग्नकार्यात गेली नाही. तूझ्या सुनेने जसं तुला मोलकर्णी बनवले."
आता मात्र अनुराधाच्या भावनांचा कंप फुटला. डोळे पाणावले ती आजीला म्हणाली, "आजी तुम्ही सांगा मी काय करायला हवं होतं. माझ्या हुशार आणि जबाबदार मुलाला प्रेम विवाहसाठी नकार दिला असता तर त्याच्या बुद्धीवर आणि मनावर कोणत्याही प्रकारचा आघात झाला असता. त्याला योग्य अश्या मुलीला नकार देण्याचा काही कारणच नव्हतं. म्हणून मी लग्न लावून दिले. लग्नानंतर सुनबाईवर लहान वयातच मोठ्या मोठ्या  जबाबदाऱ्या टाकून तिच्या चुका काढून रोज वाद घालण्यापेक्षा मी तिच्या  मनाने घेतले ज्या मुलीच्या हुशारीवर माझ्या मुलाने प्रेम केले तिला घरात बसून तिच्यातील क्षुल्लक कारणानी चुका काढून रोज वाद घालण्यापेक्षा तिच्या मनाने घेणं... मला पटले. मी असताना बाळाला पाळणा घरात ठेवावे कशाला? ज्या भजन कीर्तनाची तुम्ही गोष्ट करत आहात तिथे नक्की भजन कीर्तन होते ..?”
अनुराधा प्रश्नार्थक नजरेनं बोलत होती..."साऱ्या  स्त्रिया आपले गाऱ्हाणे एकमेकांना ऐकवतात तिची सून हे करते म्हणून आपल्या सुनेकडून त्या अपेक्षा करतात. अनुराधा आपल्या छातीवर हात ठेवत अभिमानाने म्हणाली, 
"माझ्या सुनेने माझ्या कष्टाच चीज केले त्याचा गर्व आहे मला "
"तुला कोण समजावणार," अस म्हणून आजी पुन्हा घरी निघून गेली .
अनुराधाला तिने केलेल्या कर्तव्याचे दुःख नव्हतेच तिला सुनबाईचा विरह नकोसा वाटत होता. सुनबाईंनी सरळ सरळ माहेरी निघून गेल्याने हृदयात कुठेतरी टीच बसली होती विचारांच्या काहूरातच अनुराधा झोपली. सकाळी सकाळी किचनमध्ये आवाज येत असल्याने अनुराधा किचन मध्ये गेली सुनबाई चहा टाकत होती.
"सुनबाई तू कधी आलीस"" अनुराधा म्हणाली
"मी रात्रीच आली  तुम्ही गाढ झोपलेल्या होत्या म्हणून उठवले नाही "सुनबाई म्हणाली
किचनच्या खिडकी बाहेर बघत अनुराधा ने विचारले ,"राहिली नाहीस माहेरी" .
“सासुबाई ,कसलं आणि कोणत माहेर? फक्तं देखाव्याचे. आज जेव्हा मी यशस्वी झाले तेव्हा त्यांनी मला ओळखले इतक्या वर्षात त्यांना माझी आठवण ही झाली नाही असं उगवत्याला नमस्कार करणाऱ्या लोकांपासून थोड लांबच बरं. गरीबाचे खर प्रेम ही क्षुल्लक आणि श्रीमंतांचे खोटे लफडे ही कौतुकाचे अशी ही सामाजिक कीड लागलेली प्रवृत्ती.            
     काल त्यांनी नात्याकडे एक पाऊल पुढे केले म्हणून मीही तेवढेच पाऊल पुढे केले फक्त चहा घेतला आणि निघाले ..”. सुनबाई म्हणाली.                      
 "बर,, कधी शिफ्ट व्हायचे तुला नोकरीसाठी" अनुराधा ने विचारले
“मला नाही आपल्याला शिफ्ट व्हायचे आहे. सासूबाई” अनुराधाला चहा देत सुनबाई पुढे म्हणाली...
 “तुम्ही सुद्धा माझ्यासोबत येणार आहात अशी अर्ध्यावर साथ नाही सोडू देणार मी तुम्हाला सासुबाई... हवी तशी सोयरीक मिळाली असते तुम्हाला तुमच्या मुलासाठी. कदाचित तुमचा मुलगा ही काही दिवसांनी मला विसरून तुमच्या प्रेमापोटी तयार झाला असता दुसरीकडे लग्नाला. पण सासुबाई तुम्ही माझ्या प्रेमावर विश्वास दाखवला.. कधी तुम्हाला माझ्यामुळे चारचौघात मान नाही मिळाला. तरी तुम्ही संतुष्टी राहिले आमच्या प्रेमापोटी..आत्तापर्यंत पळून आलेल्या मुलीची सासू म्हणून जे लोक हिणवत होते त्यांच्यासमोर ऑफिसरची सासू म्हणून मिरवा जरा ..”. सुनबाईनी ऐठ दाखवत अनुराधाच्या हातातील रिकामा  कप घेतला.. आणि म्हणाली "सासुबाई मी जरा शांती आजींना ही मिठाई देऊन आलेच.. काल गडबडीत देण्याची राहूनच गेली होती शिवाय त्यांचा आशीर्वादही घ्यायचा राहिलाच होता."
     बाहेर पेपर वाचत असलेल्या सुयशने जेव्हा घडला प्रसंग ऐकला तेव्हा त्याला आपल्या प्रेमविवाह निर्णयावर आणि बायकोवर अभिमान वाटला.  समोर असलेल्या शांती आजीच्या घराकडे बघून अनुराधाला विचार आला.
“निंदकाचे घर असावे शेजारी..”

आवडल्यास शेअर ऑप्शननेच शेअर करा.
   🖋️ मयुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...