४५ वर्षांच्या दिवाणाला नुकताच नोकरीवरून काढून टाकला होता. साहेबांनी सगळ्यांसमोर अपमान करून ऑफिसमधून बाहेर हाकलून टाकलं होतं. गेल्या बारा महिन्यांतील ही त्याची तिसरी नोकरी गेली होती. रात्र झाली होती. तो गावाबाहेर झाडाखाली असलेल्या बाकावर बसला होता. घरी जायचा त्याचा अजिबात मूड नव्हता. तो बाकावर बसून सतत मित्रांना फोन करत होता. कोठे काही नोकरीची जागा असेल तर सांग, अशी विनंती करत होता. त्याला तातडीने नोकरीची गरज होती.
दिवाण आळशी नव्हता. पण वाढत्या संगणकाच्या वापराने तो मागे पडला होता. त्याने संगणक शिकून घेतला होता, पण नव्या मुलांसारखं त्याला नीट हाताळता येत नव्हतं. म्हणून चुका व्हायच्या आणि त्याचा राग साहेबांना यायचा. रात्री दहा वाजता तो निराश होऊन घरी परतला. घरात पाऊल टाकताच बायको ओरडली.
“कुठे होतात एवढा वेळ? कोणत्या बाईसोबत फिरत होता? लाज नाही का वाटत? घरात मोठी मुलगी आणि मुलगा बसलेत. त्यांच्या लग्नाचं वय निघून चाललंय, आणि तून्ही अजूनही बेजबाबदार !”
दिवाण काहीच बोलला नाही. बायकोच्या रोजच्या ओरडण्याला उत्तर देणं त्याने आता सोडून दिलं होतं. तो बाहेर ठेवलेल्या नळाजवळ हात-तोंड धूवत होता, तेवढ्यात मुलगी धावत आली.
“पप्पा, माझा मोबाईल आणलात का?”
दिवाण गप्प राहिला. मुलीने पुन्हा विचारल -“पप्पा, उत्तर का नाही देत?
सकाळी वचन दिलं होतं ना, संध्याकाळी मोबाईल घेऊन येणार म्हणाला होतात ! ”
पण तो काही बोलला नाही. काय बोलणार? मोबाईलसाठी आगाऊ पैसे मागितल्यामुळेच साहेबांनी त्याला नोकरीवरून काढलं होतं. मुलगी जुना मोबाईल दाखवत म्हणाली -
“पाहा ना पप्पा, खरोखर खराब झाला आहे. ऑन करताच हँग होतो.”
दिवाण काहीच उत्तर देत नव्हता. त्याला माहित होतं, ही बातमी सांगितली तर घरातलेच त्याला दोष देतील. हात-तोंड धुवून तो खोलीत गेला. बायको बेडवर बसून मोबाईलमध्ये गुंतली होती. त्याने पाऊल टाकताच ती ओरडली.
“उत्तर द्या ना ! बहिरे झालात का? मुलीला मोबाईल का नाही आणला?”
तो हलक्या आवाजात म्हणाला - “पैसे अजून हातात आले नाहीत. आले की आणीन.”
ती म्हणाली - “हातात नव्हते तर उधार घ्या ना ! "
तुम्हाला ठाऊक आहे ती स्पर्धेची तयारी करतीये. मोबाईलशिवाय कशी शिकेल?”
दिवाणकडे उत्तर होतं, पण आता त्याने गप्प राहणं शिकून घेतलं होतं. तो स्वयंपाकघरात गेला. स्वतःची थाळी घेतली आणि जेवायला बसला. मुलगा २४ वर्षांचा आणि मुलगी २२ वर्षांची होती. दोघेही अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत. म्हणून स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं शक्यच नव्हतं. तो जेवत असतानाच मुलगा बाहेरून आला ओठांवर गाणं आणि अंगाला दारूचा वास. वडिलांना पाहताच सरळ आपल्या खोलीत गेला. पहिल्यांदा असं झालं तेव्हा दिवाण त्याला ओरडला होता, पण मुलानेच हात पकडून उलट त्यालाच डोळे दाखवले होते. त्या दिवसानंतर दिवाणने त्याच्याशी बोलणंही बंद केलं. सगळं ऐकून, सगळं सहन करून तो शांतपणे झोपला. सकाळी लवकर तो पुन्हा नोकरीच्या शोधात बाहेर पडला. तो जाणून होता - कामाशिवाय घर, संसार, सगळं कोसळेल. संपूर्ण दिवस भटकत राहिला, काहीच खाल्लं नाही. भुकेमुळे आणि दमल्यामुळे त्याची तब्येत ढासळली. चालता-चालता तो रस्त्यावर आला. आणि एका ट्रकने त्याला चिरडलं. त्याला तडफडायलाही वेळ मिळाला नाही. सगळं संपलं.
त्याच्या मृत्यूनंतर घरचं सगळं जग बदललं. कर्जदार लोक घराची पायरी झिजवू लागले. नातेवाईकांनी फोन उचलणं बंद झालं. वायफाय बंद, नेट बंद. मुलं-बायको आता जे मिळेल ते खात होते. मुलगा एका कपड्याच्या दुकानात ७ हजार रुपयांनी कामाला लागला. मुलगी एका खाजगी शाळेत ५ हजारावर. बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, साजशृंगार थांबला, हसणं हरवलं. पूर्वी पतीवर ओरडणारी ती, आता त्याच्या आठवणींनी गप्प राहायची. तो जिवंत असताना सगळे निर्धास्त होते. त्याच्या मृत्यूनंतर सगळं थांबून गेलं.
तेव्हा त्यांना उमगलं, तोच त्यांची शांत झोप होता, तोच त्यांची भाजी-भाकरी, आसरा होता. तोच त्यांच्या आयुष्याचा आधार होता. पण त्याची किंमत त्यांना त्याच्या जिवंतपणी कधीच कळली नाही.
बापाची कदर करा 🙏🏻 तो गेला, की घरात अंधारच अंधार पसरतो. 💔
💬 तुमच्या वडिलांची कोणती आठवण आजही मनात आहे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा