"गूगल अमेरिकन कंपनी आहे की भारतीय?" ट्रम्पचा सुंदर पिचाईंना इशारा.
“मला धमकावण्याचा प्रयत्न करू नका. मला शिक्षण आणि ज्ञान भारताने दिलं आहे. मी केवळ अमेरिकेची सेवा करत नाही, मी मानवतेची सेवा करतो.” सुंदर पिचाईंचं जोरदार उत्तर !
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवर भारताला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शांत पण ठाम उत्तर देत आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली. हे केवळ शब्दांचं युद्ध नव्हतं, तर ते होतं - आत्मसन्मान, सामर्थ्य आणि खऱ्या नेतृत्वाचं प्रतीक. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केलं. त्यावेळी ट्रम्प म्हणाले, “भारत तंत्रज्ञान आणि लोकशाहीबद्दल बरेच बोलतो. पण अमेरिकन कंपन्या आणि अमेरिकन संस्थांशिवाय भारताने हा प्रगतीचा टप्पा गाठला असता का?”
भारताला कमी लेखण्याचा हा प्रयत्न पाहून जयशंकर यांनी पिचाईंना उत्तर देण्याचा इशारा केला.
पिचाई बोलू लागले. त्यांच्या आवाजात नम्रता होती, पण शब्दांत वजन आणि ठामपणा होता, “सर, मी भारतात जन्मलो. माझ्या देशाने मला शिक्षण दिलं, मूल्ये शिकवली. ज्ञान आणि तंत्रज्ञानाला पासपोर्ट लागत नाही. भारतीय शिक्षक, अभियंते आणि कुटुंबांनी केलेल्या त्यागामुळे माझा प्रवास शक्य झाला.”
सुंदर पिचाईंच्या या स्पष्ट उत्तराने ट्रम्प काही काळ स्तब्ध झाले. थोड्याच वेळात जयशंकर म्हणाले, “भागीदारी ही कमजोरी नसते, ती ताकद असते” आणि भारताचा सन्मान उंचावला. सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं.
दुसऱ्या दिवशी ट्रम्प पुन्हा भारताला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करत म्हणाले, “जर भारताने अमेरिकन नियमांचे उल्लंघन केले, तर त्याला व्यापार निर्बंधांना सामोरे जावे लागेल. मला स्पष्ट सांगा, सुंदर, गूगल अमेरिकेसोबत आहे का भारतासोबत?”
पिचाई काही क्षण शांत राहिले आणि नंतर उत्तरले, “मी नेहमी मानवतेची सेवा प्रथम करेन. अमेरिकेने मला संधी दिली. भारताने मला मुळे दिली. एका देशाचा सन्मान करण्यासाठी मला दुसऱ्याला नाकारायची गरज नाही. मी जेव्हा नवनिर्मिती करतो, काही घडवतो, तेव्हा मी दोन्ही राष्ट्रांची सेवा करतो. मी सर्वांची सेवा करतो.”
त्यांच्या या शब्दांनी राष्ट्रांच्या पलीकडे जाऊन मानवतेचं महत्व अधोरेखित झालं. पुन्हा एकदा सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
शिखर परिषदेच्या अंतिम दिवशी ट्रम्प यांनी उघडपणे धमकी दिली, “भारताने आज रात्रीपर्यंत अमेरिकेसाठी आपला बाजार पूर्णपणे खुला करावा. अन्यथा त्याला निर्बंधांना सामोरे जावं लागेल. सुंदर पिचाई, मला आत्ता उत्तर द्या - गूगल अमेरिकेसोबत आहे का भारतासोबत?”
सुंदर पिचाई शांतपणे उभे राहिले आणि ठामपणे म्हणाले, “जर एखादा देश किंवा एखादी व्यक्ती मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी भीतीमुळे झुकणार नाही. मी कधीही दबावाखाली झुकणार नाही. मी फक्त सन्मानापुढे नतमस्तक होतो, कधीही जबरदस्तीपुढे नाही. कोणतंही राष्ट्र असो, जर त्याने अधीनतेची मागणी केली, तर मी कधीही शरण जाणार नाही.”
सभागृहात उपस्थित सर्व नेते उभे राहून पिचाईंच्या धाडसी भूमिकेला दाद देऊ लागले.
ही परिषद केवळ व्यावसायिक चर्चा राहिली नाही - ती मानवता, नेतृत्व आणि तत्त्वांचा टर्निंग पॉईंट ठरली. सुंदर पिचाईंच्या शब्दांनी लाखो तरुणांच्या मनात आशा आणि अभिमान निर्माण केला. त्यांनी सत्तेपुढे झुकण्याऐवजी नम्रता, आदर आणि सत्याचं रक्षण करून एका राष्ट्राचा सन्मान जपला.
या घटनेने पुन्हा एकदा जागतिक इतिहासात ठामपणे अधोरेखित झालं - तत्त्वं ही सत्तेपेक्षा श्रेष्ठ असतात !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा