मुलीचे पालक :- मुलाला पगार किती आहे ?
स्वत:चे घर आहे का ?
गावी शेती आहे का?
कार आहे का ?
अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का ?
बहिणींची लग्न झाली आहेत का ?
आई-वडिल कुठे असतात ?
मुलगा : मुलगी काय करते ?
मुलीचे पालक : डिग्री झालीयं नोकरी शोधत आहे,
डिप्लोमा कोर्स करतेयं,
सर्व्हीस आधी करत होती,
लग्नाचं चाललयं म्हणून सोडलीयं...
आता २-३ महिन्यात लगेचंच,
ऑफिस लांब पडतंय
म्हणून जॉब सोडलायं,
घरीच असते, तिला गृहसजावटीची आवड आहे.
मुलगा :- मग तुम्ही अस स्थळ का नाही शोधत ?
जो मुलगा नोकरी शोधतोय किंवा ज्याला पुढे लागणार आहे ?
काका, एक साधी गोष्ट आहे.
जर मुलाकडे नोकरी,
घर, शेती, गाडी नसेल तर तुम्ही तुमची मुलगी द्याल का ?
नाही ना ?
तर मग मुलीकडे काहीही नसताना मुलाने का करावे अशा मुलीशी लग्न ?
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
पगार माझा,
घर माझं,
शेती माझी,
कार माझी,
कष्ट माझे,
इन्व्हेस्टमेंट माझी.
मी काय मूर्ख आहे काय ? तुमच्या मुलीला फुकट पोसायला ?
पूर्वीचा जमाना गेला काका, जेंव्हा पुर्वीचे लोक हुंडा द्यायचे व घ्यायचे, आता जमाना बदललाय, तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या अपेक्षा बदला आणि हो महत्त्वाचे म्हणजे तुमची मुलगी घरी येऊन काय
आयत्या पिठावर रेघोट्या मारणार का?
मुलीची बाजु म्हटले की, लग्नानंतर करेल की ,शिकेल की ,
होईल की,*जमेल की,*लागेल की,
बघु की.
पण तुम्हांला आणि तुमच्या मुलीला मुलगा मात्र रेडीमेड पाहिजे.
कुठेही कमी नको,
असं कसं चालेल काका.
साधी गोष्ट आहे काका, तुम्हांला जसे सर्वगुणसंपन्न मुलगा हवाय मग मुलाकडचे ही सर्वगुण संपन्न मुलगीच बघणार ना.
मुलींकडच्यांना अजूनही कळत नाहीये कि, लग्नाचे स्वरूप बदलत्या काळानुसार पूर्णपणे बदलले आहे. ते अजूनही मुलगी द्यावी श्रीमंत घरी आणि सून आणावी गरीब घरची. या आधारावर स्थळे शोधात आहेत आणि याउलट
मुलाकडील अगदी
प्रॅक्टिकल विचार करून
जो कष्ट करतो, त्याच्याच घरी लक्ष्मी वास करते.
या आधारावर स्थळे
शोधात आहेत. समोरून चालून आलेले स्थळ मुलींकडचे उद्धट उत्तर देऊन नकार देताहेत का तर कोणीतरी करोडपती/श्रीमंत स्थळ येऊन माझ्या मुलीला येऊन घेऊन जाणार आहे.
आशा 'स्वप्नांच्या दुनियेत अजूनही आहेत.
मुली आणि त्यांचा पालक भारी-भारी श्रीमंत वेल-सेटल स्थळ शोधून काढत आहेत आणि फोन करतात जेने करून मुलीला पुढे कोणतेही त्रास नको.
मुलांकडील फक्त आणि फक्त मुलींबद्दल विचारणा करतात आणि मुलींकडचे
पगार,
घर,
शेती,
बहिणीची लग्न,
आई-वडिल कुठे असतात,
इन्व्हेस्टमेंट आणि अजून बरंच काही.
मग मुलांनो व्यक्ती म्हणून तुम्हांला काय महत्व ?
तुमचा उपयोग मग काय ?
फक्त एटीएम मशीन का ?
मुलांनो एक साधी गोष्ट आहे. जर तुम्हांला बारावीला 40 ते 50 टक्के मार्क्स् पडले तर पुढील शिक्षणांसाठी चांगले कॉलेज मिळेल का ? नाही ना ?
मुलींच काय आहे ना की, स्वतःला पडलेत चाळीस-पन्नास टक्के
आणि एडमिशन हवंय हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये.
मुलांनो खालील खर्चाचा कधी विचार केलाय का ?
१. शहरातील एका मुलाच्या
शिक्षणाचा खर्च....
(ग्रॅज्युएशन पर्यंतच फक्त १२ + ४ ) इथून पुढे कमीत कमी २० लाख. बाकीचे खर्च अजून वेगळेच.
२. आई-वडिलांचा (म्हातारपणात) आजारपणाचा खर्च
(वाढत्या वयांनुसार बीपी, शुगर, दातांच्या समस्या, संधिवात, डोळ्यांची दृष्टी, अजूनही काही गंभीर आजार व त्यांचा खर्च विचार न केलालाच बरा. )
३. मुलीच्या गर्भारपणांतील वर्षभरातील नियमित तपासण्या, औषधं, त्याप्रमाणे आहारा वरील खर्च. डिलीव्हरीचा खर्च.
४. मुलांच्या (लहान वयात) सर्दी, खोकला, ताप, आजाराचा खर्च, डायपरचा खर्च (दररोज कमीत कमी तीन वर्षांपर्यंत),
जुळे झाले तर मग डबल धमाका.
५. बायकोच्या व स्वत:चा घरातील कार्यक्रम –
नातेवाईकांचे लग्न (आहेर), लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च), डोहाळजेवणं, सुपारी कार्यक्रम, गावांला जाणे येणे,
कार्यक्रमासाठी नवीन कपडे खरेदी आणि या सर्वांचा पेट्रोल व टोलखर्च.
५. मित्र-मैत्रिणींचे कार्यक्रम–लग्न (आहेर), लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च) , डोहाळजेवणं,
सुपारी कार्यक्रमाला जाणे येण कार्यक्रमांसाठी
नवीन कपडे खरेदी आणि या सर्वांचा पेट्रोल व टोलखर्च.
६. महिनाभराचा मोबाइल, डिश टीव्ही रिचार्ज, कामवाली, महिनाभराचा बाजार, पेट्रोल, लाईट बील, घरपट्टी, पाणीपट्टी, सोसायटी मेंटेनन्स.
७. एक वेळ साधे बाहेर जेवायला बसले तर, एक हजार रुपये पुरत नाहीत.
८. घराचे हफ्ते कमीत कमी
२० वर्षे ते पण नोकरी असेल तोपर्यंत.
बघितले ना ? सगळी अवघड कामे मुलांकडे आणि
मुलींकडच्यांना हे सगळं सोपच वाटतंय.
महागाईचा आलेख
दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.
स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ही मुलगाच घेणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही मुलगाच करणार,
संसार मुलगाच करणार ?
का संसार फक्त मुलाचांच आहे का ?
मग मुलगी घरी काय करणार ?
मुलींची आणि त्यांच्या पालकांची जी अपेक्षा आहे ना की, श्रीमंत घरी जायचंय.
ते बंद करा मुलांनो, मुलींना झाडावरुन खाली उतरवण्याचे काम तुमचे आहे.
मुलांनो लक्षात ठेवा सगळ्या चाव्या तुमच्या हातात आहेत. तुम्ही मूर्खासारखे खुप अवघड आहे, म्हणून रडत बसलांय.
तुमचीच शेती/कष्ट/ कार/पगार/घर, तुम्हांलाच ठरवायचंय की पुढे जायचंय की नाही.
तुम्हांला घरी नवीन सदस्य आणायचांय ना ?
मग तुम्हींच जास्त पारखले पाहिजे ना ?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना घरी बसून खायची पद्धत बंद करा. मुली बऱ्याच गोष्टीत आधुनिक झाल्यात ,
तुम्ही त्याच जुन्या जमान्यात अजून जगतांय. मुलांनो जवळजवळ सगळ्याच मुलींना श्रीमंताच्या घरी जायचंय.
जरा लघु उद्योजक,
शेतकरी,
छोटे दुकान व्यापारी,
कमी पगार असणारे इंजीनियर /डॉक्टर/वकील/रिसेप्शनिस्ट/ऑफिसबॉय/सेक्युरिटी गार्ड/ शिपाई यांच्याशी कोण लग्न करणार, का त्यांना मन/इच्छा नाही का ?
मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्यात असे बोलुन चालणार नाही. जो पर्यंत मुलेही त्यांच्या अपेक्षा वाढवत नाहीत ना आणि मुलींना स्पष्टपणे
सांगत नाही ना की,
आम्ही आमच्याच लेव्हलचेच स्थळ पाहतोय /तुमच्या अपेक्षा खुप जास्त आहेत.
तोपर्यंत हे असेच चालत राहील.
मुलांनो जर तुम्हांला नोकरी नसेल तर कोणी मुलगी देईल का ?
चांगला पगार नसेल तर
कोणी मुलगी देईल का ?
जर तुमच्याकडे शेती नसेल तर कोणी मुलगी देईल का ?
जर तुमच्याकडे स्वतःचे घर नसेल तर कोणी मुलगी देईल का ?
मग मुलीकडेही या गोष्टी नसतील तर मग मुलानं का करावे अशा स्थळाशी लग्न ?
मुलांनो त्यामुळे वेळीच जागे व्हा.
मग मुलीं कडच्यांनाही कळू द्या की, तुम्ही आयतं बसून खायचं आमंत्रण देताय.
हे लक्षात ठेवा
मुलींच्या पालकांना नम्र विनंती
विचार करायला लावणारे...
नुसता Biodata बघुन न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थिती पाहणी करा मग निर्णय घ्या. प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नोकरी लावु शकतो कां? याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका. नाहीतर इम्रान खान सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.....
शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारीही मुले आहेत. नुसती डिग्री बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे. बिचारी इंजिनिअर झालेली मुले Company मधे 8000/- पगाराने सुपरव्हिजन करतात. पोलिस भरतीत जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुल बिचारे रांगेत उभे राहतात. कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतो याचा विचार करा आणि प्रत्यक्ष स्थळ बघा मगच निर्णय घ्या. आणि नुसती डिग्रीच बघायची असेल तर रात्री 9:00 नंतर बियरबार मधे जाऊन बघा अनेक डिग्रीवाले दिसतील. बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है ! आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 25 ते 28 वर्षाच्या आहेत. त्यांच्या ईच्छा, भावना यांचा विचार करत नाही. आजच्या युगात आयुष्य सरासरी 60 वर्ष आहे, 30 वर्षात कोणते सुख मिळवायचे.
खोट्या बोलणाऱ्यावर प्रेम करा आणि मुलींचा संसार खराब करा.. सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा 1,00,000/-रू आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो.
युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. "मरायच सर्वांना आहे, परंतु मरावंसं कोणालाच वाटत नाही.आजची परिस्थिती तर फार गंभीर आहे.. "अन्न" सर्वांनांच हवंय पण.. "शेतकऱ्याशी लग्न " करावं असं कोणालाच वाटत नाही. "पाणी" सर्वांनाच हवंय. पण.. "पाणी" वाचवावेसे कोणालाच वाटत नाही. "सावली" सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे" लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही. "सुन" सर्वांनाच हवीं आहे.. पण "मुलगी" व्हावी असं कोणालाच वाटत नाही. विचार करावा असे प्रश्न .पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा