स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर....
जगात आज अनेक अरबपती असतील, पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला तो राॅकफेलर मुळे. प्रचंड श्रीमंत माणूस. जगातील पहीला अरबपती. रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मित्र, सगेसोयरे फक्त पैसा घटना अशी घडली 1893 साली वयाच्या 53 व्या वर्षी हा माणूस आजारी पडला. डोक्यावरचे सारे केस झडून गेले. शरीर गळायला लागलं. तोंडात अन्न गिळेना , थोडसं सुप पिऊन जगण्याची वेळ आली. त्याला झोपही लागत नव्हती , ईतकच नाही तर त्याला हसता रडता देखील जमेना. अमेरीकेतील सर्व नामवंत डाॅक्टरना दाखवून झाले पण उपयोग शुन्य. डाॅक्टरनी शेवटी सांगितले आपण फक्त एक वर्षाचे मेहमान आहात. त्याचवेळी स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये होते आणि राॅकफेलर च्या एका मित्राने सहजच एक सल्ला दिला की, हिंदुस्थानांतील एक संन्यासी ईथे आलाय. आपण एकदा त्यांची भेट घ्यावी. राॅकफेलर सुरवातीला भडकला "असल्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही, तो सन्यासी काय करणाराय? " म्हणून त्याने टाळले. पण काय कुणास ठाऊक दोन दिवसांनी तो भेटीला निघाला. स्वामी विवेकानंद हाॅटेलच्या रुममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते. राॅकफेलर जाऊन थांबले. राॅकफेलरला अपेक्षा होती मी एवढा माणूस माझ्यासाठी मोठं आदरातिथ्य होईल पण विवेकानंदानी ढुंकूनही पाहिलं नाही. शेवटी राॅकफेलर म्हणाला मी उद्योजक राॅकफेलर.
स्वामी म्हणाले, "बरं...मग"
"मला पाहुन ईथला राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभा राहतो"- ईति राॅकफेलर
"असं आपलं काम सांगा" स्वामी विवेकानंद
शेवटी स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली.
"तुम्ही मनाने फार बैचैन आहात" आणि मग त्याच्या जीवनातील अशा काही घटना सांगीतल्या की, ज्या त्याच्याशिवाय कुणाला माहिती नव्हत्या. तो ही परेशान झाला. एक तासांच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदानी त्याना सांगीतलं की यावर एकच पर्याय आहे, तुम्ही दानधर्म केला पाहिजे. राॅकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पडला, की त्याने एक फाउंडेशन काढलं, त्यातुनच पुढे मलेरिया, टीबी, यारख्या अनेक रोगावर औषध बनवून मुफ्त मध्ये ईलाज झाले, तो जगातील सर्वात मोठा डोनर झाला.
पुढे??? आश्चर्य हे झाले ज्याला एक वर्षाची मुदत डॉ. नी सांगितली होती तो राॅकफेलर 98 वर्षे जगला तोही आनंदात. आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे, बील गेट्स तो त्याच्या पुस्तकात लिहीतो, मला डोनेशनची प्रेरणा राॅकफेलर फाउंडेशन मुळे मिळाली.
ही आहे एका हिंदू संन्याशाची व हिंदू तत्त्वज्ञानाची किमया, आणि आम्ही मात्र आज त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतो, आपली ताकद ओळखा आणि भौतिक सुखाच्या मागे लागुन पैसा हे सर्वस्व आहे हे समजु नका, वेळ आली ना कि तोहीं कामाचा नाही. आणि मुख्य म्हणजे द्यायला शिका.
निस्वार्थपणे द्याल तरच मिळत जाईल आणि फक्त स्वतःसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त साठवाल तर सडायला सुरवात होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा