भारतातल्या 1150 वृद्धाश्रमांपैकी एकातही एकही मुस्लिम नाही, असे का? सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपली संस्कृती जगात महान आहे. हिंदू संस्कृती महान आहे. देशात महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी मानले जाते पण हे खोटे आहे. एका अहवालानुसार भारतात ११५० वृद्धाश्रम आहेत व या वृद्धाश्रमांत ९७ हजार वृद्ध लोक राहतात. महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गंत विना अनुदान तत्त्वावर चालवले जातात. स्वत:ला सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ६५ वृद्धाश्रम आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. पैकी १ कोटी वृद्ध लोक आहेत. हिंदूंना लाज वाटली पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमांची का गरज पडते ? आई वडिलांना न संभाळण्याची कुपवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते. या ठिकाणी मुद्दाम नमूद करावे वाटते की, भारतातील सर्वच्या सर्व म्हणजे ११५० वृद्धाश्रमांत एकही मुस्लिम वृद्धाश्रम नाही.
अहवालानुसार मुस्लिम समाज आईवडिलांना सांभाळतात व त्यांची देखभाल करतात. कुराणमध्ये अल्लाह नंतर आईवडिलांच्या चरणी जन्नत आहे असे ते समजतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा अगदी नावांलाही वृद्धाश्रम नाही आणि तशी गरजही नाही. मात्र हिंदू समाजाचे सर्वत्र जिकडे तिकडे अनाथाश्रम व वृद्धाश्रम दिसतात. सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवशकता भासणे ही अत्यंत लाजिरवाणी व शरमेची बाब आहे. वृद्धाश्रम व अनाथाश्रम हा हिंदू संस्कृतीवरचा कलंक आहे. आपले आई वडील मुलांना जड व्हावेत इतकी नीच वृत्ती समाजात वाढली आहे. पुणे या बाबतीत तर नंबर एक वर आहे सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यांत आहेत. वैद्यकीय शास्त्रांतील प्रचंड प्रगतीमुळे नवसंशोधित उपचारांनी वयोमान वाढले आहे. पण माणसांतील ओलावा माणूसपण मात्र पार आटला आहे. लोकांच्या घरातील कुत्री गलेलठ्ठ झाली आहेत आणि मातापिता आठ आठ दिवस उपाशी राहतातत.
काय झालंय काय या गाबडयांना ? यासाठीच का जन्माला घातले होते का त्यांनी ? शांतपणे विचार करा देशांत एकही वृद्धाश्रम मुस्लिमांचा नाही यावरुन काय बोध घ्याल बोला ? श्रावण बाळ योजना आणावी लागते. संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते. कुठे तो श्रावण बाळ, कुठे आजची बिलंदर बाळे ? बरेचसे बैलोबा म्हणतात
बायको ऐकत नाही. ती आणि तू सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहातच ना ? हे विसरू नका पोरगा उच्च शिक्षित आणि बायको डिग्रीवाली तरी जन्मदात्यांनाच विसरलात.
सामाजिक जबाबदाऱ्या शिकवल्याच जात नाहीत आणि एक मुलगा एक मुलगी पॅटर्न आल्याने काय झाले, एकुलता एक म्हणून दिवट्याचे फारच लाड होत असतात आणि तोच घातक ठरत असतांना दिसत आहे. आई-वडील एकच दिवटा आहे म्हणून मुलांच्या अनेक चुका दुर्लक्षित करत असल्याने ते उदंड आणि उनाड होत चालले आहे. जरा आवरा लाडल्याला ! नसता, हा लाडला तुम्हांलाच लावील धक्क्याला ! काय माहिती असते की मोठा होऊन लग्न झाल्यावर हे दिवटे जन्मदात्यां सोबत असे वागतील यांची पाय गुण जन्म झाल्यावरच कळाले असते तर यांना लहानपणीच बालसुधार गृहात भर्ती करून द्यायला पाहिजे होते म्हणजे जन्मदात्यांना म्हातारपणी पच्छाताप करण्याची वेळच आली नसती हो !
संस्कार द्या तरच वृद्धाश्रमें कमी होतील..!
नसतं, भयानक वास्तव आ वासून येत आहे. लक्षांत ठेवा.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा