माझ्या लाडक्या मुला... मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची
कारणं तीन... जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी
कधी घडतील - बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अतक्र्य. आपण अमुक इतके दिवस जगू हे
कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या... मी बाप आहे
तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही
सांगणार. मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट,
जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून
काही गोष्टी तुला सांगतोय. वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव,
आयुष्यभर.
माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे , ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. तेव्हा , जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण , हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस. जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील, नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा , हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही. आयुष्य फार छोटं आहे. आणि , तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे , “आज” वाया घालवलास तर 'उद्या' कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा , आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा. “प्रेम” ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस. अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी , ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण , याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील.
'नॉलेज, ज्ञान' हे एक “शस्त्र” आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय... पण , कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना. माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मी ही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर , तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं... हा निर्णय तुझा तू घ्यायचास. आणखी एक, मी ही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे , ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. तेव्हा , जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण , हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस. जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील, नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा , हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही. आयुष्य फार छोटं आहे. आणि , तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे , “आज” वाया घालवलास तर 'उद्या' कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा , आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा. “प्रेम” ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस. अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी , ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण , याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील.
'नॉलेज, ज्ञान' हे एक “शस्त्र” आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय... पण , कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना. माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मी ही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर , तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं... हा निर्णय तुझा तू घ्यायचास. आणखी एक, मी ही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
● (नाशिकचे निष्णात मानसशास्रतज्ञ डॉ. शिरीष राजे, यांनी आपल्या मुलांना लिहीलेले हे पत्र सर्वच पाल्यांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त आहे)...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा