सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

249. सकारात्मक नि नकारात्मक विचार

     एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती, मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वाऱ्यानं गदागदा हालू लागलं. पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, "पडशील." तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, "सांभाळ, घट्ट पकडून ठेव." खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्या पासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरुन घसरून खाली पडला. मात्र दुसऱ्या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला. काय बरं असेल या मागचं कारण? पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला. या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला होता. म्हणून, नेहमी सकारात्मक बोला. सकारात्मक कल्पनाचित्रे निर्माण करा. म्हणजेच सकारात्मक बदल घडून येईल.
        आपल्या प्रार्थनेवर आणि आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा. "Think Positive, Be Positive" कधी कोणाच्या परत येण्याची वाट पाहू नका, कारण ते हरवलेले अजिबात नसतात.. तर ते मनापासून बदललेले असतात. आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.  घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते. शेती रस्त्यावर असेल, तर त्यालाही भाव  असतो... पण माणूस रस्त्यावर आला, की त्याची किंमत  संपते. काही माणसं लाखात एक असतात, आणि काहींकडे लाख असले, तरी ते माणसात नसतात. दु:खाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एखादी वस्तू न वापरता गंजते, आणि जास्तच वापरली तर झिजते. काहीही झालं, तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केंव्हांही उत्तमच. तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचं जन्म नव्हे, तर तुमचं कर्म ठरवत असते, कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो, त्याला त्याचं कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो.            
         सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा. अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा. प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...