कुठं गेलं चुलीचं धुराडं
अन कोंबड्याचं खूराडं//१//
अन कोंबड्याचं खूराडं//१//
दुर्मिळ झाली पुरणाची पोळी
अन हुलग्याची शेंगोळी//२//
मिळतय का प्यायला माडगं?
गेलं कुठं जनावरांचं वाडगं? //३//
गाडगं तर लोपच पावलं
ऊखळ मुसळ केरात गेलं//४//
किती पौष्टिक होती राळ्याची खीर,
आणि रुखवातातील सारनाची पुरी//५//
कधी गायब झालं घरातलं जातं,
लाकडी नांगर, शिवळाटीचं पातं//६//
आता सांगा बांधील का कोणी
गाडीची साकन,औताचं यठण//७//
गेला कुठं पायातला तोढा
अन् ऊधळणारा घोडा //८//
कुठं गेली वावरातली पंगत
पत्रावळीच्या जेवणाची रंगत//९//
खरोखर विहिरीतच बुडाली
ना पाणी शेंदन्याची बादली//१०//
कसं शोधायचं झऱ्याचं पाणी
आणि पाखरांची मंजूळ गाणी//११//
लोप पावली नऊवारी साडी
अन् मांजरपाट धोतराची जोडी//१२//
गायब झाला हा सारा ऐना
त्यामुळेच झाली माणसाची दैना//१३//
खरच हरवलं जात्याचं पीठ
अन पांढऱ्या खड्याचं मीठ//१४
गव्हाच्या लापशीचा वास कुठं गेला...
खरच हा खजिना कोणी लुटून नेला? //१५//
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा