आमच्या संयुक्त कौटुंबिक घरात आम्ही ५ ते ९५ वयोगटातील १४ जण राहयचो. आज, माझ्या आईचा रोज वावर असलेली दोन्ही घरे आता निर्वासित आहेत आणि आता त्यांचा व त्यांच्या बागांचा निसर्गाने ताबा घेतलेला मी पाहतो. जांभूळ, शेवगा, काही अशोक, कडुनिंब आणि पिंपळ टिकून आहेत. परंतु आता असंख्य रंगांची मनमोहक फुलं गेली,एकूणच सर्व सौंदर्य क्षणिक आणि नाजूक आहे आणि एन्ट्रॉपीचा नियम शक्तिशाली आहे, हेच सत्य. माझ्या आईच्या हातातून रोज दाणे टिपणाऱ्या मोराच्या कुटुंबाचे काय झाले असेल हा मला पडलेला एक अगम्य प्रश्न आहे. बुलबुल, चिमण्या, पोपट, स्पॉट फ्लायकॅचर, कोकिळा, माकडांची एक मोठी टोळी जी महिन्यातून एकदातरी त्या ठिकाणाचा विध्वंस करायची - हे सगळे कुठे आहेत. माणसे निघून गेली की वास्तू एक घर बनते. सुरुवातीला मला वास्तू विकाविशी वाटली नाही. पण आता तेथे जावेसे देखील वाटत नाही. एकतर काळ आमच्या चौदापैकी दहा जणांना घेऊन गेला आहे. मी आमच्या वास्तुच्या आजूबाजूला फिरतो आणि शेजारील वास्तू बघतो. जवळपास माझ्या घरासारखे चित्र मला दिसते. कधी एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांचे नशीब आता फिरले आहे, बदलले आहे किंवा ते घरच आता पडलेले आहे. आपण घरे बांधण्यासाठी एवढे कष्ट का घेतो?बर्याचदा, आपल्या मुलांना त्याची गरज भासणार नाही किंवा त्याहूनही वाईट, ते त्यासाठी भांडणे करतात. हा कोणता मानवी मूर्खपणा आहे, की या अनिश्चित कार्यकाळ असलेल्या भाडेतत्त्वावरील आपल्या जीवनासाठी आपण एक कायमस्वरूपी मालकी स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे आयुष्य आपल्याला मिळाले आहे त्याच्या कालखंडाबद्दल आपल्याला काहीच अधिकार नाही, त्याच्या अटी शर्ती वर आपले नियंत्रण शक्य नाही आणि त्याविरुद्ध कोठेही दाद मागणे शक्य नाही, त्यावर अपील नाही त्यासाठी कुठले न्यायालय देखील नाही. एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व विश्व आणि मासिक हफ्ते भरून उभ्या केलेल्या वास्तू, एकतर उद्ध्वस्त होईल, किंवा त्यासाठी भांडण केली जातील, किंवा ते विकले जाईल किंवा नष्ट होईल. प्रत्येक वेळी मी एखादा फॉर्म भरतो तेव्हा 'कायम पत्ता' विचारणारा रकाना भरतो तेव्हा मला मानवी मूर्खपणाबद्दल हसू येते.
झेनची एक कथा आहे, एकदा एक वृद्ध भिक्षू एका राजवाड्यात गेला आणि रक्षकाला विचारले की तो या विश्रांती गृहा एक मध्ये रात्र घालवू शकतो का? रक्षकांनी त्यावर त्याला खडसावले, "काय विश्रांती गृह, तुला हा राजवाडा आहे हे दिसत नाही का?". साधू म्हणाला, “मी काही दशकांपूर्वी इथे आलो. तिथे कोणीतरी राज्य करीत होते. काही वर्षांनी, त्याच्याकडून त्याचे राज्य कोणीतरी घेतले, नंतर कोणीतरी. कोणतीही जागा जिथे रहिवासी सतत बदलत राहतो ती जागा एक विश्रांती गृह आहे. जॉर्ज कार्लिन म्हणतात "घर हे फक्त एक ठिकाण आहे जिथे तुम्ही बाहेर जाताना तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि परत येताना अधिक सामग्री घेऊन येता."जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात. जेव्हा घरात अनेक रहिवासी सदस्य असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घरटे रिकामे होते, तेव्हा आपल्याला सहवास हवा असतो. आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जगणे सोडून देणाऱ्या आणि शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून समजलेल्या विश्रांती गृहामधून निघून जाणाऱ्या माणसांवर पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील. मानवी इच्छेचा वृत्तीचा खरा फोलपणा.
जावेद अख्तर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा