वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, "पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे. बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा ,असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे. वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले, नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला, कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता , ह्याला मी किती मदत केली होती. सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल. नाते बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही. तरीपण एक नात टिकून राहते ते नातं मुलीचं, तितक्यात मुलीचा फोन येतो, ती विचारते--- पप्पा गेले होते का दवाखान्यात? औषधं घेतलीत का? काय म्हणाले डॉक्टर? जेवण झाल काय? नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात. थोडा पश्चातापही होत असतो, मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?
लोक मुलगा झाला कि स्वतःला भाग्यवंत समजतात. मला असे वाटते, ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत. एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते काळजी करू नका मी आहे.
🌹रिटायर्ड सदस्यांना समर्पित🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा