सोमवार, १५ जानेवारी, २०२४

867. आपण जितके जास्त देतो तितके..

      सकाळी एक भिकारी भीक मागण्यासाठी घरातून बाहेर पडला.  पौर्णिमेचा दिवस होता.  एक धार्मिक उत्सव होता आणि त्याला  खूप आशा होती की आज त्याला खूप काही मिळेल. नेहमीप्रमाणे तो जेव्हा  घरातून बाहेर पडला,  त्याने आपल्या झोळीत मुठभर तांदूळ टाकले. झोळी पूर्णपणे रिकामी असेल तर भिक्षा कोणी देणार नाही कारण  लोक भिकाऱ्यांना क्वचितच देतात - ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी देतात;  ते त्यांच्या अहंकारासाठी देतात.  वाटेत भिकारी येताच त्याला आश्चर्य वाटले कारण  राजाचा सोनेरी रथ येत असल्याचे त्याने पाहिले. आजपर्यंत तो राजाच्या दरवाज्यातूनच परत आला होता कारण  राजवाड्यात प्रवेश करण्याची संधी नव्हती. राजासमोर झोळी पसरवण्याचे भाग्य कधीच मिळाले नाही. आज माझ भाग्य उजळनार. आता कदाचित भीक मागायची गरज पडणार नाही.  राजा येत आहे आणी ते माझी झोळी भरुन भिक्षा देणार असा विचारत करत असतानाच धूळ उधळत राजाचा रथ त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. राजा  रथातून खाली उतरल्यावर तो भिकारी गोंधळून गेला.  आता काय करावं तेही समजत नव्हतं!  तो झोळी पसरून भिक्षा मागायची विसरुन गेला  आणि काही समजायच्या आत राजानेच आपली झोळी त्याच्यासमोर पसरवली.  आणि म्हणाला: माफ कर ज्योतिषांनी सांगितले आहे की, जर मी सकाळी लवकर रथावर बसून जो प्रथम भेटेल त्याच्या जवळ भिक्षा मागितली तर या राज्यावर येणारे संकट टळू शकेल, अन्यथा हे राज्य मोठ्या संकटात सापडेल. त्यामुळे  तुला ह्या माझ्या झोळीत काही तरी टाकावे लागेल. तू पहिला माणुस आहेस.  मला माहीत आहे की तू भिकारी आहेस;  तुझी झोळी हे सर्व सांगत आहे.  तु नेहमी घेतला आहेस कधी काही  दिले नाही - हे मलाही माहीत आहे.  तुला ते देणे खूप कठीण जाईल, परंतु आज ते करावे लागेल.  कारण हा प्रश्न संपूर्ण साम्राज्याचा आहे.  नाकारू नको  काहीही दे, तुला जे द्यायचे आहे ते दे.  तांदळाचा एक दाणा दिला तरी चालेल.
      भिकारी झोळीत हात घालतो.  त्याने कधीच दिले नाही.  देण्याची सवय नव्हती.  देण्याचे संस्कार नव्हते , झोळीत मूठ बनवतो आणि उघडतो.  बांधतो आणि सोडतो.  मग मोठ्या हिमतीने त्याने तांदळाचा एक दाणा काढून राजाच्या झोळीत टाकला. राजा  रथावर आरूढ झाला, सोनेरी रथ धूळ उडवत निघून गेला.  भिकारी धुळीकडे पहात उभा राहिला आणि विचार करू लागला,काहीही मिळाले नाही, उलट माझे स्वतःचे एक धान्य देखील हरवले. नंतर दिवसभरात त्या भिकार्याला भरपूर दान मिळाले, पण तो राजाला दिलेला तांदळाचा एक दाणा मनात ठोठावत राहिला - दिवसभर त्याने दिवसभर भिक्षा मागितली भिक्षा भरपूर मिळाली पण ते त्याला रुचले नाही;  सकाळचा तोच प्रसंग त्याला पुन्हा पुन्हा आठवायचा.  माझ्या हातून एक तांदूळ  द्यावा लागला!  मागण्याची संधी होती, तीही गेली;  उलट माझ्यापासूनही काहीतरी दूर गेले, माझ्या झोळीतील एक दाणा कमी झाला.  संध्याकाळ झाली तेव्हा उदास होऊन घरी आला. बायकोला खूप आनंद झाला: त्याची झोळी भिक्षाने  कधीच भरली नव्हती पण आज ती भरली होती.  ती म्हणाली आम्ही भाग्यवान आहोत, आज आम्हाला खूप काही मिळाले!  पण तो भिकारी म्हणाला आज आपण किती गमावले हे तुला माहीत नाही! मी आज सम्राटाकडे सर्व काही मागितले असते पण तो गेला. त्याने संपूर्ण कथा सांगितली आणि जवळचे एक धान्यही गेले असे सांगून दु:खी झाला.राजा भेटण्याचा योग पुन्हा नाही मिळनार ह्या विचारणे तो खुपच दु:खी होता.  खिन्न मनाने त्याने झोळी  ओतली आणि दोघेही स्तब्ध उभे राहिले.  त्या सर्व तांदळाच्या दाण्यांपैकी एक दाणा सोन्याचा झाला होता. ते पाहुन भिकारी छाती ठोकून रडायला लागला.  ज्या धान्यासाठी मी दिवसभर रडलो होतो;  आता खूप मोठी चूक झाली असे छाती ठोकून रडायला लागला: जर मी राजाच्या पिशवीत सर्व धान्य ठेवले असते तर सर्व धान्य सोने झाले असते.

तात्पर्य : आपण जितके जास्त देतो तितके त्याचे सोने होते.  आपण जितके विनावश्यक साठऊ तितकी ती धूळ बनते. जो सर्व काही देतो, त्याचे सर्वस्व सोनेरी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...