कुणीच कुणाच्या जवळ नाही हीच खरी समस्या आहे,
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावास्या जास्त आहे.
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावास्या जास्त आहे.
हल्ली माणसं पहिल्या सारखं दुःख कुणाला सांगत नाहीत,
मनाचा कोंडमारा होतोय् म्हणून आनंदी दिसत नाहीत.
एवढंच काय तर एका छताखाली राहणारी तरी माणसं जवळ राहिलीत कां ?
हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिलीत कां ?
हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिलीत कां ?
अपवाद म्हणून असतील काही पण प्रमाण खूप कमी झालंय्,
पैश्याच्या मागे धावता धावता दुःख खूप वाट्याला आलंय्.
नातेवाईक व कुटुंबातले फक्त एकमेकाला बघतात,
एखाद दुसरा शब्द बोलतात पण काळजातलं दुःख लपवतात.
जाणे येणे न ठेवणे, न बोलणे या गोष्टी नैमित्तिक घेऊ नका,
गाठी उकलायचा प्रयत्न करा जास्त गच्च होऊ देऊ नका.
धावपळ करून काय मिळवतो ? याचा जरा सखोल विचार करा,
बँकेचं बचतखातं भरण्यापेक्षा आपल्या माणसांची मनं भरा.
एकमेकाजवळ बसावं,बोलावं आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी थोडं सरळ रेषेत चालावं.
समुद्री चोहीकडे पाणी आणि पिण्याला थेंबही नाही,
अशी अवस्था झालीय माणसाची
यातून लवकर बाहेर पडा. चर्चा करून उपाय शोधा
नुसतं Convent, CBSE, MBA,IIT, MS, पॅकेज,
managements Skill, Second Home, Europe Tour,
Registry, Dimond Jwelary याला काहीही अर्थ उरणार नाही.
managements Skill, Second Home, Europe Tour,
Registry, Dimond Jwelary याला काहीही अर्थ उरणार नाही.
माणुसकी नसलेली घरे अन् देव नसलेले देव्हारे,
कितीही सुंदर असले तरी त्याचा काय उपयोग ? ..
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा