भाऊ काय बहीण काय ,
नुसता फापट पसारा,
कोण कोणाला विचारतंय
कुणालाही विचारा ...
नुसता फापट पसारा,
कोण कोणाला विचारतंय
कुणालाही विचारा ...
कुणी कोणाकडे जाईना
कुणी कुणाकडे येईना,
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येईना ...
संवेदनशीलता आता
फारशी कुठं दिसत नाही,
बैठकीत किंवा ओसरीवर
गप्पाची मैफिल बसत नाही ...
पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी
इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,
यातच हल्ली माणसाचा
होत आहे The End ...
Luxury मधे लोळतांना
फाटकं गाव नको वाटतं,
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं ...
उच्च शिक्षित असूनही
माणूस आज Mad वाटतो
इंटेरियर केलेल्या घरामधे
लुगडं, धोतर Odd वाटतं..
सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय Posh असतील?
पार्लर मधून आणल्या सारखे
चिकणे चोपडे कसे दिसतील?
उन्हा तान्हात पळणारी
माणसं काळी पडणारच,
गरिबीनं गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच ...
कुरूप ते नाहीत
कुरूप तू झालास,
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास ..
सुख असो वा दुःख असो
आपल्या माणसाला विसरू नये.
कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास
माणसावर प्रेम करायचं विसरलास..
आपल्या पासून दूर जाशील तर मानसिक आरोग्यासाठी
दारोदार भिक मागत फिरशील ...
दुसऱ्याचा छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही,
पॅकेज कितीही मोठं असू द्या
जगण्यात मजा येणार नाही. .
जग जवळ करतांना
आपली माणसं तोडू नका,
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका..!
मी का बोलू? फोन का करू?
का कमीपणा घेऊ ? का नमते घेऊ? का नेहमी मिच समजून घ्यायचं ?
असे बरेच सारे "मी" आहेत
जे आयुष्यात विष कालवतात ...
म्हणून शक्य असेल तर मी पणा सोडा....
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा