वासुदेव नुकताच अमेरीकेवरुन घरी आला होता. सकाळच्या वेळी वासुदेव नास्ता करायला बसत होता. आईने कुतूहलाने त्याला विचारले "तु अमेरिकेत नेमका करतोस तरी काय?"
वासुदेव म्हणाला "आई तु डार्विनचं नाव ऐकलस का? नसशिल ऐकललं, मी एक जेनेटिक इंजिनीअर आहे. त्याच डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या थेओरीवर मी काम करतोय."
आई त्याच्या जवळ येवून बसली आणी त्याला म्हणाली "अरे डार्विनची उत्क्रांतीची थिअरी तर नवी आहे. तु त्याहुन जुन्या थिअरी वर काम का नाही करत?'
वासु विचारात पडला त्याला प्रश्न पडला की आता त्याहून जुनी थिअरी कुठली?
आई बोलत होती "तुला विष्णुचे दशावतार माहित आहेत का रे?"
वासुदेव ने डोक नाही म्हणून हलवल......
'नाहीना मग आता ऐक" आई म्हणाली.
"पहीला अवतार--मत्स्य--म्हणजे मासा. जीवनाची सुरुवात पाण्यात झाली म्हणून मत्स्य अवतार ओळखला जातो.
दूसरा अवतार कूर्म म्हणजे कासव जे दर्शवत की पाण्यातून सुरु झालेल जीवन जमिनीकडे जातय. यात पाणी आणि जमीन समान राहते"
"तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर ज्याचा अर्थ जमिनीवरील पाळीव प्राणी तसेच मोठ्या आकारचे भुचर जसे डायनासॉर सारखे प्राणी जन्माला आले. यात पाण्यात कमी आणि जमीनवर वावर जास्त'
"चौथा अवतार होता नरसिंहाचा ज्याचा अर्थ अर्धा प्राणी आणी अर्धा मनुष्य म्हणजेच प्राण्यां पासुन मानवाकडे वाटचाल सुरु झाली. यात पाणी पिण्यापुरतंच. मनुष्य हा प्राण्यासारखा पण जास्त बुद्धिमान"
"पाचवा अवतार--वामन जो उंचीने छोटा ब्राम्हण होता पण तो मोठा होउ शकत होता त्याने पूर्ण पृथ्वी व्यापली होती. जुन्या काळातही असेच दोन गट होते Homo Sapiens आणि Homo Erectus असच एकदा त्या दोघांच युद्ध झाल आणि ती लढाई Homo Sapiens नी जिंकली" "का माहीती आहे का जिंकली....?कारण ते उंचीने व बुद्धीने मोठे होते म्हणून जसा वामन होता."
आई पण कथेत दंग झाली होती. वासुदेव अवाक व स्तब्ध होवून ऐकत होता.
"सहावा अवतार परशुराम जो कुऱ्हाड धारण केलेला जंगलात राहणारा शिघ्रकोपी तपस्वी पुरुष होता जसा अष्मयुगातील जंगलात एकटा राहणारा प्राण्याची कात धारण केलेला मानव होता. जंगलाची कास धरून मानव मोठा होत होता"
"सातवा अवतार राम म्हणजे बुद्धिवंत राजा ज्याने जगाला जगण्याचे कायदे व नात्याचे महत्व सांगितले. तत्सम अष्मयुगीन मानवही कुटुंब परिवार व गट करून राहु लागला होता त्याला सोबत राहण्याच महत्व कळाल होतं"
"आठवा अवतार कृष्ण जो एक उत्तम मित्र, गुरु, मार्गदर्शक, प्रियकर व राजा होता. त्याने जगाशी खेळ खेळून प्रेम व युद्ध याच ज्ञान दिलं. जीवन जगण्याची कला दिली त्यालाच आपण भगवदगीता म्हणतो. तोच मानव शिक्षण घेऊ लागला त्याला शिक्षण म्हणजे काय कळले. वेगवेगळे विद्यापीठ स्थापन झालेत. मनुष्य प्राणी शिकु व शिकवु लागला."
"नववा अवतार बौद्ध जिथे एकीकडे नरसिंहासारखा हिंस्र मानव होता तिथे सत्य, अहींसा, सदाचाराचे संदेश देणारे, जगाला मोक्षाचे महत्व सांगणारे बौद्ध पण जन्माला आलेत. म्हणजेच ताम्रयुगानंतर थोर संत विचारवंत जन्माला आलेत ज्यांनी जगाच्या चाली रिती बदलल्यात."
आई एवढ बोलून थांबली.
"आणी दहवा?" वासुदेवने कुतुहलाने विचारले.
आई हसत म्हणाली "अरे दहावा अवतार म्हणजे कल्कि जो मनुष्याचा जेनेटिक मधे बदल केलेली आवृत्ति आहे ज्यावर तुम्ही अभ्यास करत आहात...."
"हा दृष्टिकोन तू कुठून आणला आई?"
'विज्ञान आणी धर्माला आम्ही अशाच नजरेने बघतो' आई न्याहारी देत हसून म्हणाली.
माणसाने नेहेमी विज्ञानासह अध्यात्मिक तेची कास धरावी. अध्यात्म समजण्यास कठीण आहे पण ते ज्याला समजले त्याने जग जिंकले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा