जशी प्राप्त झाली तशी
१) भगवान श्रीकृष्णांचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला
२) जन्मतारीख १८ जुलै, ३२२८ ई.स. पूर्व
३) महिना: श्रावण
४) दिवस: अष्टमी
५) नक्षत्र: रोहिणी
६) दिवस: बुधवार
७) वेळ: १२:०० रात्री
८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.
९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व
१०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.
११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.
११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.
१२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)
१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.
कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.
मथुरेत कृष्ण, कन्हय्या
ओडिशामध्ये जगन्नाथ
महाराष्ट्रात श्रीकृष्ण,
राजस्थानमध्ये श्रीनाथ
गुजरातमध्ये द्वारकाधीश
गुजरातमध्ये रणचोछोड
कर्नाटकातील उडुपी कृष्णा
केरळमधील गुरुवायुरप्पन
जन्म ठिकाण:- मथुरा
जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव
संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद
बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम, (द्रौपदी मानलेली बहीण.)
गुरु, शिक्षक:- ऋषी संदिपनी
जिवलग मित्र:- सुदामा
धर्मपत्नी ८:- रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)
कृष्णाची मुले:- एकूण ८०
श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.
श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.
श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.
श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.
श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.
श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.
श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.
श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.
राधा:- राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती.
श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु
आवडती फुल:- फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे). प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते. शंख:- शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.
आयुधं:- त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.
बासरी:- कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .
मोरपंख:- रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.
शिक्षण:- श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.
कार्य:- कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले. श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.
गीता उपदेश:- महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.
श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते ! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."
"मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते." गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही." सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.
अवतार समाप्ती:- महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।
अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।
परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।।।।
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय।।। .
श्रीकृष्णाने काय शिकवले?
तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? श्रीकृष्णानं भगवद्गीतेचं एवढं भव्य दिव्य ज्ञान जगासमोर विषद केलंय, अजून काय पाहिजे? परंतु गीतेतलं ज्ञान हे फक्त शिक्षित, विचारवंत, सुसंस्कृत माणसांसाठी आहे,तर मग सर्व सामान्य माणसांनी काय शिकावं त्यांच्याकडून? अहो, श्रीकृष्णाचं चरित्र, त्याच्या आयुष्यातील करामतीच्या कथा, यामध्ये एवढं व्यवहार ज्ञान, वागण्याची कसब, संकटसमयी वापरायचं अवधान आणि इतरांना प्रभावित करायच्या हातोट्या आहेत कि त्यापासून बोध घेतला तर अगदी सामान्य माणसांपासून मोठ्मोठ्या उद्योजकांना आणि नेत्यांना देखील भरपूर फायदा होईल. शिकण्यासाठी, श्रीकृष्णाच्या चरित्रात, “जरासंध-वध” कथा हा एक प्रमुख बोधस्तंभ आहे. जरासंध हा सर्वात बलाढ्य अश्या मगध देशचा (आजचा बिहार) राजा, तो कंसाचा सासरा आणि परम-मित्र. श्रीकृष्णाने कंसाला मारल्यानंतर त्याने १७ वेळा चढाई करून मथुरा लुटली, ज्यामुळे श्रीकृष्णाला मथुरा सोडून द्वारकेमध्ये आपलं बस्तान हलवावं लागलं. यामुळेच तर श्रीकृष्णाला रणछोड हे नांव पडलं. राजा जरासंध हा महा बलवान महयोध्दा तर होताच. तसंच जन्माच्या वेळी जरा नावाच्या राक्षसीने त्याच्या शरीराचे दोन तुकडे मायावी विद्येने जोडल्याने, त्याच्या शरीराला सर्व शस्त्रांपासून संरक्षण होतं. जरासंधाची मगध सेना अखंड भारतवर्षात अजिंक्य होती. अश्या सर्व बाजूंनी बलवान राजाला यमसदनाला पाठवायला,श्रीकृष्णाने वापरलेले हे डावपेच आजही अक्कलवंताना, राजकारण्यांना, आणि जगातील सर्व हरहुन्नरी माणसांना अप्रतिम समुचित धडेच आहे. अश्या बलवान जरासंधाला नामोहरम करण्यासाठी आपल्या हुशार श्रीकृष्णाने वापरलेली ५ खुबीदार संघर्षाची टेक्निकस आता आपण पाहुया.
१. भेदनीति. (Divide and Conquer )
कृष्णाला माहित होतं कि यादवांची आणि पांडवांची सेना जरासंधाच्या सेनेसमोर कस्पटासमान होती. कधीच त्यांना हरवू शकली नसती. एकेरी मल्ल युध्दांत भीम कदाचित वरचढ ठरेल. म्हणून त्याने पांडवांना मल्लयुद्धाचं आव्हान जरासंधास द्यायला प्रवृत्त केलं. या क्लूप्तीमुळे जरासंध त्याच्या सेनेपासून अलग पडला.
२) कमजोरीचा फायदा (Exploit the weakness)
जरासंधाची कमजोरी होती त्याचा गर्विष्ठपणा आणि हेकेखोरपणा. त्याला मल्ल युध्दाला आव्हान देऊन त्याने त्याचा अहंकार डिवचला. ज्यामुळे विचार न करता आव्हान स्वीकारून तो एकटा भीमापुढे आला. त्याने विचार केला असता तर स्वतः ऐवजी आपल्या बलवान मल्लाला त्याने भीमा विरुद्ध मैदानात पाठविला असता.
३) योग्य माणसाची निवड (Choose the right warrior)
मल्ल युद्ध करायला श्रीकृष्ण स्वतः नाही रिंगणात उतरला. किवा अर्जुनाला नाही पाठवला. भीमाची निवड करून त्याने सर्वात जास्त बाहुबळ असलेल्याचा उपयोग केला. जी गोष्ट जरासंधाचे दोन तुकडे करायला कामी आली.
४) मानसिक संघर्षाचा वापर (Use of Psychological Warfare)
मल्ल युद्धात दोघे उतरण्यापूर्वी कृष्णाने मानसिक दबावतंत्र वापरून जरासंधाच्या मनाची दिशाभूल केली. भीम जेव्हा जरासंधाला आव्हान देण्यासाठी गेला तेव्हा तो लवकर सकाळी पोहोचला. जरासंध अर्धवट झोपेतच होता. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून भीम गळ्यात पुष्पहार घालून गेला होता. त्यामुळे अर्धवट झोपेत असलेल्या जरासंधाला तो एखादा बावळट, कमकुवत वाटला आणि त्याने आव्हान विचार न करता स्वीकारलं.
५) वेळ साधून बळाचा वापर आणि सतर्क राहून बदल करणे- (Timing & Adaptability)
श्रीकृष्णाने भीमाला सांगितलं कि “ जरासंध मल्ल-युद्धात तुझ्याहून वरचढ आहे, प्रथम तू जरासंधाला जवळ येऊ देऊ नकोस आणि त्याच्या कुस्तीच्या पेचात न अडकता पळत रहा. जेंव्हा तो पूर्णपणे दमेल त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे त्याची दोन शकले कर.”
आणि जेव्हा दोन शकले करूनही जरासंध मरत नव्हता, त्यावेळेस भीम सतर्क असल्याने, श्रीकृष्णाने दर्भाच्याची काडी वापरून केलेली खूण, त्याच्या लक्षात आली आणि त्याने आपल्या डावपेचांमध्ये योग्य तो बदल केला.जरासंध्याची शकले त्याने दिशा बदलून एकमेका विरुद्ध दिशांना फेकली. अश्या प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या अति-बलाढ्य शत्रूचा कमीत कमी साधनं वापरुन पाडाव केला. श्रीकृष्णाचे असे चतुराईचे, मनोविज्ञानाचे, सतर्कतेचे आणि परिस्थितीनुरुप बदल करण्याचे हे धडे अत्यंत बहुमूल्य आहेत.
तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही. प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले. राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकून ही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती. पण हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !! एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्य अभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यात ही तो परत कधीच आला नाही. अत्यंत उत्कटपणे नाती निभावून ही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला. परत कधीच परतून न येण्यासाठी !! त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला. राधे बरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जपले यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सुर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही !! ज्या उत्कटतेने त्याने राधे साठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला तसाच अर्जुना बरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कुट नीतीने गाजवले. राधे ला तो जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होवून सांगत असे त्याच आपुलकीने अर्जुनला शत्रूस कसे आणि का संपवायचे हे ही ही सांगितले. एका पेक्षा एक अभेद्य , अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरती ढगात पाठवले जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होत. ज्या हळूवार पणे त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळूवार पणे त्याची बोटे सुदर्शन चक्र ही चालवत असत. हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही. कारण.....कारण तो कृष्ण होता. संभवामी युगे युगे असे त्याचे स्वतः चे वचन आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता...आहे आणि राहील....गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची.
कोण आहे श्रीकृष्ण ?
पहिला अपशब्द ऐकल्यानंतर
शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा
नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा
संयम आहे तो आहे श्रीकृष्ण !
सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना
सुद्धा हातात मुरली आहे
तो आहे श्रीकृष्ण !
द्वारकानगरी सारखे वैभव असताना देखील
सुदामा सारखा मित्र आहे !
तो आहे श्रीकृष्ण !
शेषनागाच्या मृत्यूरुपी मुखावर
उभे असताना देखील नृत्य होत आहे !
तो आहे श्रीकृष्ण !
प्रचंड सामर्थ्य असताना देखील
युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे!
तो आहे श्रीकृष्ण !
श्रीकृष्ण ही केवळ एक व्यक्ती नाही
श्रीकृष्ण हा एक विचार आहे.
जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावे लागले.
पालनकर्त्यांनाही सोडावे लागले.
मित्र मंडळींनाही सोडावे लागले.
जिच्यावर प्रचंड प्रेम केले तिलाही सोडावे लागले.
गोकुळ सोडले. शेवटी मथुरा ही सोडली.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
परिस्थितीच अशी निर्माण झाली की
काही ना काही सोडावे लागले.
पण काही सोडावे लागले नसेल तर
ते आहे...देवत्व ! निर्मळ हास्य !
प्रचंड मोठी सकारात्मकता !
श्रीकृष्ण जाणून घेणे म्हणजे
जीवनाचा सार जाणून घेणे !
कृष्णनीती म्हणजे यशस्वी
समाधानी जीवनाचा मार्ग !
ज्याला कृष्ण समजला तो
आयुष्यात कधीही पराभूत होऊ शकत नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा