बिल गेट्स म्हणतात,
"भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो. परंतु मजेची गोष्ट ही आहे कि, या देश्यातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो. कारण त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही. या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही कि तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे?
भयाण वास्तव...
१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो. तसेच, पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी लावले जाते. मग, ताण (Tension) आला कि दारूची दुकान जवळ असते. करतो जीवन बरबाद. मग, स्वतःला दोष देतो.
२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून भांडणे लावणाऱ्या मालिका, तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये यांमध्ये त्या गुंग असतात. मग त्यांचे कुटुंब आणि त्या त्यांना मग कोण सहन होत नाही.(सासू, सासरे) ३) इथला नौकरी असणारे पुरुष असतात. ते घाण्याला लावलेल्या बैलासारखे राब-राब राबत असतात. बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी. त्यालाच कळत नसते तो काय करतो. कारण, पगार जरी एक लाख असला तरी ८०,००० हफ्ते फेडण्यासाठी घालवत असतो. एक बँकेचे कर्ज फेडले कि मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज काढायला सांगते.
काम एवढे असते कि तो डोके वर काढू शकत नाही.
4) जेष्ट नागरिक नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही. आश्रमाची वाट बघत असतो. आणि जे लोकं जागरूक आहेत त्यांना. अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती अनेक N.G.O. मार्फत वेगवेगळ्या पक्ष्याद्वारे गुंतून ठेवले जाते. मग कसा बदल होणार? कोण करणार.? आता बाकी आहेत त्यांनी विचार करावा. केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार. सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. काय उपयोग सांग मानवा. अशा या दान धर्माचा ? कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ. कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ. कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ. कधी एखाद्या उपाश्याला घlस भरवुन बघ. कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ. कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ. कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघ. कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघ. एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ ! जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत. सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत. आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत. शाळेचे छत गळके आणि मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?शाळेत आज मुलांना बसायला साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ? शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही. आपला भारत नक्की महासत्ता होणार? पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि भाजीपाला फूटपाथवर. म्हणे आमचा देश कृषी प्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी. शेकडो मैल चालतो वारकरी. अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!
वाचा,
विचार करा,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा